• Sat. Mar 14th, 2026
    मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी खुशखबर, तहान भागवणारं महत्त्वाचं धरण आज ओव्हरफ्लो

    मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काळातच मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अशात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक धरण ओव्हरफ्लो झालं आहे. यामुळे मुंबई आणि ठाणेकरांची यंदाची तहान भागणार आहे. मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण पूर्ण भरले असून बुधवारी सकाळी एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो.

    Weather Forecast: राज्यावर पुढचे २-३ तास अस्मानी संकट, कोल्हापूरसह १० भागांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी
    तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. बुधवारी सकाळी तानसा धरण पूर्ण भरले असून बुधवारी सकाळी एक दरवाजा उघडण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

    Mumbai Rains : अतिमुसळधार पावसानंतर मुंबईकरांना नवा धोका, महानगरपालिकेकडून सर्वांसाठी महत्त्वाची सूचना
    दरम्यान, बुधवारी पालघर, ठाण्यासह मुंबईतही ऑरेंज अलर्ट कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता वाढली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून हा जोर २८ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारसाठी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.

    Tomato Price Mumbai : मुंबईत टोमॅटोने विक्रम मोडला, किलोचा भाव वाचून हादराल; नव्या दराने सर्वसामान्य चिंतेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed