• Sat. Sep 21st, 2024

अजित पवार आणि मुख्यमंत्रिपद याबाबत मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा

अजित पवार आणि मुख्यमंत्रिपद याबाबत मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा

जळगाव : उपमुख्यंंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कधीतरी एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे…अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावा हे जसं कार्यकर्त्यांचे मत आहे तसं महाराष्ट्रातील जनतेचे सुद्धा मत आहे… त्यामुळे कधीतरी एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असा आम्हाला आत्मविश्वास आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इर्शालवाडी दुर्घटनेवर देखील भाष्य केले. इर्शाळवाडी या ठिकाणी जी दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी कुठलीही यंत्रसामग्री पोहोचत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली दबलेले मृतदेह अत्यंत कुजलेल्या तसेच खराब अवस्थेत सापडत असल्याने याठिकाणी खोदकाम हे थांबावाव अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री लवकरच त्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार योग्य त्या सूचना प्रशासनाला करतील, असे ते म्हणाले.

तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना
२०२१ पर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडल्या की त्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही केली जात होती. तसेच पुनर्वसनाचे कामही केलं जात होतं. मात्र २०२१ नंतर शासनाचा आदेश आहे की अशा काही वस्तू किंवा वाड्या असतील तर त्याबाबतचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे पाठवावा त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे इर्शालवाडी सारख्या दुर्घटना या भविष्यात होणाऱ्या अशा पद्धतीच्या टाळता येतील, असे ते पुढे म्हणाले.

Satara News : मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; महाबळेश्वर-तापोळा वाहतूक बंद
यवतमाळमधील मदतकार्याला हेलिकॉप्टरची मदत घेऊ- पाटील

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याजवळ तीन नद्यांचा संगम आहे आणि या नद्यांनी अतिवृष्टीमुळे धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे ४५ लोक हे नदीच्या पलीकडच्या बाजूला अडकले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागांतर्गत नियत्रंण कक्षातून सातत्याने त्या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. एसडीआरएफच्या दोन तुकड्या त्या ठिकाणी पोचलेले आहेत व त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लवकरात लवकर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाईल असे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे, असे पाटील म्हणाले.
Ratnagiri News : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed