• Sat. Mar 7th, 2026
    दरड कोसळण्याची भीती; नागरिकांचे स्थलांतर, रायगडातील अजून एक गाव संकटात, मात्र गावकऱ्यांची वेगळीच मागणी

    रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड दुर्घटनेनंतर प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथे भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांचे तातडीने प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात मागच्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
    अर्ध घर अंगावर, तरीही त्याने कुटंबातील ६ जणांना वाचवलं, तरुणाने सांगितला ‘त्या’ रात्रीचा थरारक अनुभव
    रायगड जिल्ह्यात आंबा नदी आणि कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली असून पुन्हा धोका वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या चांदेपट्टी गावाला मागील १८ वर्षापासून दरड आणि भूस्खलन भीतीच्या छायेखाली राहावं लागत आहे. पावसाळा सुरू झाला की, गावातील नागरिकांना तात्पुरते स्थलांतरीत केले जाते. पण त्यानंतर या गावाकडे कोणी अधिकारी फिरकून सुद्धा पाहत नसल्याने येथील गावकरी मेटाकुटीला आले आहेत.

    मुंबईत पावसाची बॅटिंग, पुढील ४८ तासांत राज्यात कुठे बरसणार पाऊस?

    प्रशासन तात्पुरते स्थलांतर करते पण आमच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. त्यामुळे शेती लागवडीच्या काळात दरवर्षी आम्हाला गावाबाहेर आणले जाते. आमची गुरे ,कोंबड्या यांचा कोणी विचार देखील करत नाहीत. यावर्षी आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, पण पुढच्या वर्षी प्रशासनाने आमचा विचार केला तर आम्ही आहोत तिथेच राहू, अशा प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी दिल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed