पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यातील ४१ दरड प्रवणग्रस्त गावांमध्ये आणि इतर संवेदनशील धोकादायक गावांची समक्ष स्थळपाहणी करून या गावांमध्ये असणाऱ्या धोकादायक कुटुंबांची तात्पुरत्या स्वरुपाच्या भोजन आणि शुध्द पेयजलासह निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. संबंधित प्रशासकीय विभागाच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात तात्पुरते निवारा केंद्र उभारले असून, सध्या सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे १८, भैरवगड येथे ६० नागरिकांचे स्थलांतर केले आहे. सांडवली येथे २० नागरिकांचे स्थलांतर तंबूमध्ये करण्याचे काम सुरू आहे. जावळी तालुक्यात बोंडारवाडी येथे मंदिरामध्ये ६, भुतेघर जिल्हा परिषद शाळा येथे ३ नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
वाई तालुक्यात जोर येथे वरची कोळी वस्ती येथे ८ आणि गोळेगाव– गोळेवस्ती येथील ४ नागरिकांचे शाळेत स्थलांतर केले आहे.
पाटण तालुक्यात कोयनानगर वसाहत येथे मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील १५० नागरिकांचे तर म्हारवंड निवारा शेडमध्ये म्हारवंड गावातील ३५ नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येखील ६५ नागरिकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या वतीने सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांच्या घरी, शाळा, मंदिर येथे स्थलांतरित करण्यासाठी आवाहन केले आहे.
पाटण तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांची नियुक्ती केली असून, आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनावडेवाडी-शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व इतर संवेदनशील धोकादायक गावांवर लक्ष ठेवून आहेत.
महाबळेश्वर तालुक्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड त्यातून येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा व इतर संवेदनशील धोकादायक गावे त्यांच्याकडे आहेत.
वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी शिवाजी जगताप उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी सतिश धुमाळ, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
सातारा तालुक्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.