• Sat. Sep 21st, 2024

साताऱ्याचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, दरड प्रवण गावांची पाहणी, नागरिकांचं स्थलांतर सुरु

साताऱ्याचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, दरड प्रवण गावांची पाहणी, नागरिकांचं स्थलांतर सुरु

सातारा : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१ दरडप्रवण गावांसाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पाटण तालुक्यातील दरड प्रवणग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यातील ४१ दरड प्रवणग्रस्त गावांमध्ये आणि इतर संवेदनशील धोकादायक गावांची समक्ष स्थळपाहणी करून या गावांमध्ये असणाऱ्या धोकादायक कुटुंबांची तात्पुरत्या स्वरुपाच्या भोजन आणि शुध्द पेयजलासह निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. संबंधित प्रशासकीय विभागाच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यात तात्पुरते निवारा केंद्र उभारले असून, सध्या सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे १८, भैरवगड येथे ६० नागरिकांचे स्थलांतर केले आहे. सांडवली येथे २० नागरिकांचे स्थलांतर तंबूमध्ये करण्याचे काम सुरू आहे. जावळी तालुक्यात बोंडारवाडी येथे मंदिरामध्ये ६, भुतेघर जिल्हा परिषद शाळा येथे ३ नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

वाई तालुक्यात जोर येथे वरची कोळी वस्ती येथे ८ आणि गोळेगाव– गोळेवस्ती येथील ४ नागरिकांचे शाळेत स्थलांतर केले आहे.
पाटण तालुक्यात कोयनानगर वसाहत येथे मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील १५० नागरिकांचे तर म्हारवंड निवारा शेडमध्ये म्हारवंड गावातील ३५ नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येखील ६५ नागरिकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या वतीने सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांच्या घरी, शाळा, मंदिर येथे स्थलांतरित करण्यासाठी आवाहन केले आहे.

पाटण तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांची नियुक्ती केली असून, आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनावडेवाडी-शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व इतर संवेदनशील धोकादायक गावांवर लक्ष ठेवून आहेत.
वेदांतासोबत डील मोडली, कर्नाटकशी चर्चा आता तामिळनाडूच्या मुख्यमत्र्यांची भेट, फॉक्सकॉनच्या मनात नेमकं काय?
महाबळेश्वर तालुक्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड त्यातून येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा व इतर संवेदनशील धोकादायक गावे त्यांच्याकडे आहेत.

वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी शिवाजी जगताप उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी सतिश धुमाळ, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
देशातील श्रीमंत नेत्यांची यादी जाहीर, काँग्रेस नेते डीके शिवकुमारांकडे सर्वाधिक संपत्ती, सर्वात गरीब आमदार?
सातारा तालुक्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

रोहित शर्माने १०० व्या कसोटीत रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाही जमली नाही ही मोठी गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed