• Mon. Mar 9th, 2026
    ओव्हटेक करताना भरधाव बोलेरो पलटी, पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना अनर्थ; एकाचा मृत्यू

    सातारा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडीचा लोधवडेनजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये १ जण ठार तर ७ जण जखमी झाले आहेत. या अपघातात कल्याण भोसले हे ठार झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. हे सर्व भाविक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील गुजरवाडीचे रहिवासी आहेत. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक ही गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो गाडी क्रमांक एमएच ११ बीएच ०८९६ घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत इतर आठ जण गाडीतून प्रवास करत होते. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हर टेक करत असताना अचानक बोलेरो चारवेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली. यातील सर्व भाविक जखमी झाले आहेत.

    फडणवीस २०१९ च्या शपथविधीसह सेनेच्या त्या जाहिरातीवर स्पष्टपणे बोलले, मुख्यमंत्र्यांनी ती चूक होती हे मान्य…
    गाडीत कल्याण भोसले (वय ४५) चालक, अण्णा गाढवे (वय ४२), पप्पू भिसे (वय ४०), दादासाहेब थोरात (वय ४२), सागर भोसले (वय ४५), विजय माने (वय४५), श्रीमंत पवार (वय५०), रुद्र भोसले सर्वजण राहणार गुजरवाडी ता. कोरेगाव येथील असून आठ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.

    लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. रुद्र भोसले (वय १३) हा देखील गाडीत होता. सगळ्यांना धीर देत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून पुढील उपचारासाठी सातारा येथील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी सपोनि अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी पळशी येथील तीन युवकांचा देखील भीषण अपघात झाला होता. त्यात ते तिन जण जागीच मृत्यू झाले होते.

    हा अपघात रस्त्याच्या सदोष रचनेमुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी रस्ता अचानक उंच-सखल करण्यात आला असल्याने याठिकाणी वाहने हवेत जंप करतात. याठिकाणी यापूर्वी देखील अपघात झाले असून रस्त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज स्थानिक व्यक्त करत आहेत. सह्याद्री साखर कारखान्याचे आणि कोरेगाव बाजार समितीचे माजी संचालक नावजी गुंडा भोसले यांचे चिरंजीव कल्याण भोसले हे स्वतः उत्तम पैलवान आणि प्रगतशील शेतकरी होते.

    Pune Police : सदाशिव पेठ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस कर्मचाऱ्यांना दणका, उपायुक्तांकडून कारवाईचा बडगा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed