• Sat. Sep 21st, 2024
लग्नात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवरायांची आरती, वरातीमध्ये पोवाडे, अहमदनगरच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट

अहमदनगर: विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. परंतु अहमदनगर येथील रहिवासी गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार पाडला. हिंदू स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांसमोर कायम स्मरणात राहावा. तसेच छत्रपती शिवरायांचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, या उद्देशाने थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळा पार पाडला.
Ahmadnagar News: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांचा लूक बदलला; तीच नखरेल अदा अन् तेच मोहक हास्य
विवाह सोहळा पार पडल्यानंतर विवाह सोहळ्यात विविध आर्केस्ट्रामध्ये गायली जाणारी चित्रपटाची गाणी न लावता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित पोवाडा तसेच स्फूर्ती गीते लावण्यात आली होती. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून तसेच स्फूर्ती गीते लावून होणारा विवाह सोहळा अहमदनगर शहरातच नाही तर जिल्ह्यातील हा पहिला विवाह सोहळा आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये आलेले मान्यवर पाहुणे यांचा सत्कार करणे हे नित्याचे ठरले आहे. परंतु थोरात कुटुंबीयांनी या सर्व सत्कारांना फाटा देत त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत करून तो पैसा शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना सुख सोयीसाठी दान करण्यात आला.

यातून शैक्षणिक संस्थांना दिलेला पैसा विद्यार्थी घडवण्यासाठी कामाला येईल. तसेच मंदिरांसाठी दान केलेला पैसा हा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी उपयोगी पडेल, या हेतूने हे दान करण्यात आले आहे. आज-काल लग्न म्हटले की डीजेच्या कर्कश आवाजावर वाजणारी गाणी आणि ऑर्केस्ट्रा तसेच इतर विविध प्रकारची मनोरंजनाची साधने लग्न कार्यामध्ये केली जातात. परंतु अशा विवाह सोहळ्याला फाटा देत आगळावेगळा आणि सर्व समाजापुढे आदर्श ठेवणारा असा शाही विवाह सोहळा आज अहमदनगर शहरांमध्ये पाहायला मिळाला.
Pune News: पावसात जंगल सफारीचा मोह आला अंगलट; चार इंजिनिअरिंगचे तरुण चुकले वाट अन्…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. मंगलाष्टका ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती गीते लावून लग्न लावण्यात आले. या विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडिया चांगलीच जोरदार चर्चा सुरू असून लग्नाच्या वेगळा पायंडा थोरात आणि धिसले परिवाराने पाडला आहे. समाजातील इतर घटकांनीही थोरात आणि धिसले परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे विवाह सोहळा साजरे केल्याने होणारा अनावश्यक खर्चही टाळेल. तसेच समाजापुढे एक आदर्श घडून येणारी ही पिढी संस्कृत आणि समाजकारणामध्ये चांगले काम करणारी घडेल. सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये जातीय राजकारण आणि भांडणं होत आहेत. ती भांडणे किंवा दंगे असे विवाह सोहळे पार पडल्याने कुठेतरी संपुष्टात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed