रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली येथील भीषण अपघातात अडखळ येथील दोन वेगवगळ्या कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. कदम कुटुंबातील बाप लेकीचा तर काझी कुटुंबातील मयलेकींचा मृत्यू झाला आहे. एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कदम कुटुंबातील श्रद्धा संदेश कदम ( वय १४) अडखळ, सपना संदेश कदम (वय ३४) ही आई आणि मुलगी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच कुटुंबातील स्वरा संदेश कदम ( वय ८) आणि संदेश कदम (वय ५५) या बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दापोली येथे गेलेले कदम कुटुंबीय सासरवाडीच्या लोकांनी आग्रह करूनही सोमवारी मुलींची शाळा असल्याने थांबले नाहीत. संदेश कदम हे पत्नी आणि मुलांसह अडखळ या आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. एसटी बसस्थानकात बसची वाट पाहता असतानाच पाऊस आला. त्यामुळे त्यांनी खासगी प्रवासी वाहनाने घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते या वाहनाकडे वळले.
दापोली येथे कदम कुटुंबीयांनी काही सामानाची खरेदीही केली होती. खासगी प्रवासी गाडीतून आपल्या घरी जायला निघाले. मात्र नियतीने वेगळाच डाव साधला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात बाप आणि लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल सात जण मृत्यूमुखी पडले.
दापोली येथे गेलेले कदम कुटुंबीय सासरवाडीच्या लोकांनी आग्रह करूनही सोमवारी मुलींची शाळा असल्याने थांबले नाहीत. संदेश कदम हे पत्नी आणि मुलांसह अडखळ या आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. एसटी बसस्थानकात बसची वाट पाहता असतानाच पाऊस आला. त्यामुळे त्यांनी खासगी प्रवासी वाहनाने घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते या वाहनाकडे वळले.
दापोली येथे कदम कुटुंबीयांनी काही सामानाची खरेदीही केली होती. खासगी प्रवासी गाडीतून आपल्या घरी जायला निघाले. मात्र नियतीने वेगळाच डाव साधला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात बाप आणि लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल सात जण मृत्यूमुखी पडले.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
दरम्यान, दापोली-हर्णे प्रमुख राज्यमार्गावर आसूद येथे ट्रक आणि प्रवासी रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींच्या उपचाराचा सगळा खर्च शासन करणार आहे.