या तपासणीच्या वेळी त्यांनी वाहतूक पोलिसांची मदत घेतली होती. त्या घटनेचा विसर पडल्यानंतर पुन्हा रात्रीच्या तपासणीकडे आरटीओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी रिक्षा तपासणी आवश्यक असून, त्याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे.
रात्री अनधिकृत रिक्षा रस्त्यावर
शहर व परिसरातील कंपन्यांमध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, पुण्यात रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या बरीच आहे. रात्री सार्वजनिक वाहतूक सेवा कमी असल्यामुळे महिलांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्क्रॅप झालेल्या, फिटनेस चाचणी न केलेल्या रिक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून चालविण्याचे प्रमाण जास्त आहे. इतर शहरांतील काही तडीपार पुण्यात रिक्षा चालवत असल्याचे पूर्वी पोलिसांच्या तपासात समोर आले होते. रात्री वाहतूक पोलिस व आरटीओकडून कारवाई होत नसल्यामुळे बेकायदा रिक्षा रस्त्यावर येत आहेत; परंतु, त्याकडे म्हणावे असे आरटीओकडून लक्ष दिले जात नाही.
कारवाईते हे तपासतात
- रिक्षाचे परमीट वैध आहे का?
- तिची फिटनेस चाचणी केली आहे का?
- रिक्षाचालकाने गणवेश घातला आहे?
- प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जात नाही का?
- बहुतांश कारवाई दिवसा केली जाते.
आरटीओकडे वेगवेगळी कामे असतात. परिस्थितीनुसार आम्ही कामामध्ये बदल करीत असतो. रिक्षांच्या तपासणीची मोहीम अधूनमधून राबवली जाते. एका महिलेचा रिक्षाचालकाने विनयभंग केलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, भविष्यात योग्य कार्यवाही केली जाईल.
– डॉ. अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
