• Sat. Aug 8th, 2026
    सर्वसामान्यांना बसणार फटका! भाज्याचे दर कडाडले; APMC मार्केटमध्ये ३० ते ४० टक्के दरवाढ

    नवी मुंबई: जून महिन्याचे वीस दिवस सरले तरी पाऊसाने हजेरी लावली नाही. पावसाने लावलेली ओढ आणि कडाक्याचं ऊन यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव हे अवाक्यात होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून भाजीपाल्यांच्या किंमतीमध्ये ३० ते ४० टक्क्याने वाढ झाली आहे.
    Navi Mumbai Water Cut: पाणीकपातीची टांगती तलवार; पाऊस लांबल्यास नवी मुंबईत आठवड्यातून इतके दिवस पाणीपुरवठा बंद
    मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारात झालेली भाववाढ पाहता येणाऱ्या काळात भाजीपाल्यांचे भाव आणखी वाढण्याची दाट शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एप्रिल मे मध्ये शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक रहिवासी हे गावी गेल्यामुळे भाजीपाल्यांना मागणी कमी होती. मात्र आता शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना लागणारे डबे कामावर जाणाऱ्या व्यक्तींचे डबे यामुळे एप्रिल मे महिन्यात भाज्यांचे दर हे निम्म्यावर आले होते.
    Monsoon Impact : मान्सूनचा पाऊस लांबला, भाजीपाल्याचे दर भडकले, बाजारात नेमकं काय घडलं?
    नागरिक मोठ्या संख्येने गावी परगावी गेल्याने भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाजीपाल्यांची दर कमी झाले होते. मात्र सध्या भाजीपाल्यांच्या दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांने वाढ झालेली पाहायला मिळते. त्यात आवक देखील कमी झाली आहे. आज पाचशे गाड्यांची आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस पडल्यामुळे आणि सध्या पावसाने लावलेली ओढ तसेच कडाक्याचं ऊन यामुळे भाजीपाल्याचा दर दुप्पट वाढला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

    सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जून महिना सरत चालला तरी पावसाच्या धारा येईनात. त्यामुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात मार्केटमध्ये येऊ लागला आहे. पाऊस जर वेळेत झाला तर भाजीपाल्यांचे भाव कमी होतील. नाहीतर हे दर असेच चढे राहतील असे व्यापारी संदेश ढवळे यांनी सांगितले. किरकोळ बाजारामध्ये पंधरा ते वीस रुपये किलो मिळणारा टोमॅटो सध्या ६० रुपये किलो वर पोहोचला आहे.

    हृदय निरोगी ठेवायला मदत करणाऱ्या भाज्या

    आधी मेथीची जोडी वीस रुपयांना मिळायची. मात्र सध्या २५ ते ३० रुपये किंमत झाली आहे २० रुपयांना मिळणारी कोथिंबीर पन्नास रुपयांवर येऊन पोहोचली आहे. पूर्वी दर कमी असल्यामुळे जास्त भाजीपाला खरेदी केला जायचा. मात्र सध्या कमी प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जात आहे. ग्राहकांचा प्रतिसाद आहे. मात्र दोन किलो घेणारी वस्तू एक किलोच घेतली जात आहे. भाजीपाल्याला खप होत आहे, दर वाढले असले तरी मार्केटमध्ये भाजी पडून राहत नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
    Washim Crime : नवऱ्याचे अनैतिक संबंध, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं, गर्भवती बायकोला संपवलं; मराठा बटालियनमध्ये कार्यरत जवानाचं संतापजनक कृत्य
    Tukaram Mundhe FDA : छ. संभाजीनगरचं पथक बीडमध्ये पोहोचलं, तुकाराम मुंढेंची थेट आपल्याच जन्मभूमीत कारवाई; छापा मारताच धक्कादायक बाबी समोर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed