• Sat. Sep 21st, 2024
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, विठुराया-रखुमाईचं मंदिर राहणार २४ तास खुलं

Edited by Suraj Kolekar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jun 2023, 1:38 pm

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीच्या निम्मिताने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच, या काळात देवाचे पलंग काढण्यात येतात त्यामुळे देव रात्री झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. आज पलंग काढल्यानंतर भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Vitthal Rukmini Mandir
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर राहणार २४ तास खुलं

हायलाइट्स:

  • विठ्ठल- रुक्मीणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी
  • देवांचा पलंग काढल्याने देव रात्रीही जागे राहत असल्याची प्रथा
  • भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय
सोलापूर: वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले पंढपूरमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर आजपासून २४ तास खुलं राहणार आहे. आषाढी वारी निम्मित मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श आणि मुखदर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आज ११ वाजता विठ्ठल रखुमाईचा पलंग काढण्यात आला. पलंग काढल्यानांतर आषाढी वारी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.

बेलवडीत पार पडलं पहिलं अश्व रिंगण; नेत्रदीपक सोहळयाची दृश्यं ड्रोन कॅमेरात कैद

इतर दिवशी विठुरायाची सकाळी ४ वाजल्यापासून पूजाअर्चना होत असते यानंतर रात्री ११:३० वाजता शेजारती होते. साडे अकरानंतर मंदिर भाविकांसाठी बंद राहते. मात्र, देवाचा पलंग काढल्यामुळे नित्याच्या पूजाअर्चना बंद राहणार आहेत. या वेळेचा भाविकांना उपभोग घेता यावा यासाठी मंदिर प्रशासनाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वारी चुकायची नाही! माऊलीचं ११ दिवसांपूर्वी निधन; अंध बापाला पंढरीच्या वारीचं दर्शन घडवणारा पुण्यातला ‘श्रावण’बाळ
सध्या, ज्ञानोबांची पालखी तरडगावकडे प्रस्थान करणार आहे. चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडेल. तर, तुकोबांची पालखी सणसरमधून आंथुर्णेकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी बेलवाडीत अश्वाचे पहिले गोल रिंगण पार पडले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed