इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे, शिवाजीनगरचे तेजस कांबळे यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत यांत्रिक बोट घेऊन शोधमोहीम राबवली. मात्र दोघेही सापडले नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवून शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर तब्बल बारा तास पंचगंगा नदीत शोध घेतला आणि सकाळी १२ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता तन्मयचा मृतदेह सापडला.
शवविच्छेदनानंतर तन्मयचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बारा वर्षीय मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केले आहे. फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तसेच परिसरातील पोलिस ठाण्यांतही मुलगा हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे का, याची तपासणी करण्यात आली आहे. परंतु ३५ तास उलटले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाइकांचा शोध लागला नाही. त्याचा मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवपेटीत ठेवण्यात आला आहे.