• Sat. Sep 21st, 2024

कमजोर लोग… शिवसेनेनं बॅनर लावत भाजपला डिवचलं, आमदारानं उत्तर देत लगावला टोला

कमजोर लोग… शिवसेनेनं बॅनर लावत भाजपला डिवचलं, आमदारानं उत्तर देत लगावला टोला

उल्हासनगर, ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंधातील भाजप शिवसेना (शिंदे गट) यांतील वाद उल्हासनगरमध्ये पोहोचला. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. यालाच आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत शिवसेना टोला हाणला आहे.ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा भाजप नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला. दुसरीकडे डोंबिवलीत भाजपने पत्रकार परिषद घेत मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणावर मनसेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. समस्यांपासून लक्ष वळवण्यासाठी भाजप – शिवसेनेची (शिंदे गट) ही खेळी सुरू आहे. यांचे युती शंभर टक्के होणार आणि कल्याण लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार राहणार हे सर्व पुन्हा एकत्र काम करणार, असा दावा पाटील यांनी केला आहे. डोंबिवलीमधील भाजप पदाधिकारी नंदू जोशी प्रकरण चांगलचं पेटलं असून या प्रकरणातील पीडित महिला संतापली असून तिने पोलीस ठाण्यासमोरच गेल्या दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. दरम्यान, या वादाचे पडसाद आता उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहेत.

ठाण्यातील शिवसेना-भाजपच्या वादामागे शिंदे-फडणवीसांची वेगळीच खेळी; मनसेच्या नेत्याचा धक्कादायक दावा
उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान” अश्या आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये आशन यांनी लावले. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी टोला लगावला आहे. ‘युतीची सत्ता आल्यावर छोटे छोटे काही कार्यकर्ते आहेत ते आम्हीच शिंदे साहेब आहोत आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आणि यामुळे त्यांना असा गर्व झाला आहे. आणि आमच्याशिवाय कोणीच नाही असे त्यांना वाटत आहे’, अशी टीका त्यांनी केली.

भाजप-शिंदे गटाची १०० टक्के युती होणार, अंतर्गत वादावर मनसे नेत्याचं भाष्य

उल्हासनगरमधील ती पाटी व्हायरल…..

उल्हासनगरमधील शासनाची एक पाटी व्हयरल झाली आहे. यावर आमदार म्हणून गणपत गायकवाड यांच्या ऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उल्लेख आमदार म्हणून केल आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर कार्यक्रम करताना सर्व नेत्यांनी याची खात्री केली पाहिजे. आपण कार्यक्रम करतोय आणि एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्याचे आमदार म्हणून नाव टाकतो. याबद्दल नेत्या लोकांनी पण विचार केला पाहिजे. आपण ज्या कार्यक्रमाला जात आहोत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मी तेथील आमदार असताना त्या ठिकाणी गोपाळ लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख केला गेला. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पण त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला जातो माझ्या त्यांना शुभेच्छा, असे गणपत गायकवाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed