• Fri. Mar 6th, 2026

    राजीनामा देण्याची नैतिकता श्रीकांत शिंदे यांच्यात नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, परांजपेंनी शिंदेंना डिवचलं

    राजीनामा देण्याची नैतिकता श्रीकांत शिंदे यांच्यात नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, परांजपेंनी शिंदेंना डिवचलं

    डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे यांनी खा.डॉ.शिंदेवर टीका केली आहे.

    श्रीकांत शिंदेंची खासदारकी धोक्यात रोहित पवारांनी सांगितलं वादाचं नेमकं कारण

    आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा. तसेच भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले, मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले आहे. त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.

    त्यामुळे कल्याण लोकसभेत – भाजप विरूद्ध शिवसेना (शिंदे गट ) असे चित्र दिसू लागले आहे.यावरच खासदार शिंदे यांनी उत्तर देत सांगितले की २०२४ साली मा. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर, माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
    श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी BJPची नवी खेळी? कल्याण मतदारसंघात भाजप-शिंदे गटात चढाओढ
    यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, कल्याण लोकसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे प्रतिक्रिया दिली आहे.परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक वर्षापासून जेव्हापासून शिंदे गटाचे सरकार आलेलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, या ठिकाणी सातत्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये हे वाद चालूच आहेत.

    ठाण्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असलेल्या प्रशांत जाधव याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.प्रमोद चव्हाण यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिव्यातील भाजपचे रोहिदास मुंडे यांना त्रास दिला गेला. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध भाजप हा संघर्ष सातत्याने चालूच आहे.दरम्यान, काल खासदार शिंदे यांनी जे वक्तव्य केले ते मी गांभीर्याने घेत नाही. कारण, ती वक्तव्य अभ्यासपूर्णही नाहीत.

    आव्हानं देऊ नका, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार, श्रीकांत शिंदेंचं भाजपला प्रत्युत्तर
    राक्षसी महत्वकांशी पोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आलं ते राजीनामा देतील का? त्यांच्याकडे नैतिकता आहे का? त्यांच्याकडे निष्ठा आहे का? त्यांच्याकडे समर्पण आहे का? या प्रश्नांच उत्तर नाही असं आहे. त्यामुळे ते राजीनामा अजिबात देणार नाहीत. त्यांना बोलायचं एक असतं आणि नाटक करायचं असतं. एखाद्या चित्रपटामध्ये साईड अॅक्टर असतात ना, तसे ते आहेत. कधीतरी ते अॅक्टींग करतात अशी टीका परांजपे यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed