• Sat. Sep 21st, 2024

जेवण करताना दुसऱ्या खोलीत आग,४ लाखांच्या नोटा जळाल्या अन् कुटुंबाच्या पायाखालील जमीन सरकली

जेवण करताना दुसऱ्या खोलीत आग,४ लाखांच्या नोटा जळाल्या अन् कुटुंबाच्या पायाखालील जमीन सरकली

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव गावात लागलेल्या आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याच्या चार लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या.

 

हायलाइट्स:

  • चंद्रपूरमध्ये आगीचा भडका
  • शेतकऱ्याचे चार लाख जळाले
  • खरिपापूर्वी शेतकऱ्याला फटका
चंद्रपूर : शेती उभी करण्यासाठी शेतकऱ्याने पीक कर्ज काढलं होतं. शेतातून काढलेली मका विकून आलेली रक्कम आणि बचत गटातून कर्ज घेतलेले पैसे असे घरात चार लाख रुपये होते. काल रात्रीच्या वेळी सगळं कुटुंब दुसऱ्या खोलीत जेवायला बसलं होतं. शेतीच्या नियोजनावर चर्चा सुरु होती.त्याचवेळी स्वयंपाक घरात आगीने पेट घेतला. काही कळायचा आगीचा भडका उडाला अन् होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्याच्या मदतीला गावकरी धावून गेले आग विझवली. मात्र, तोपर्यंत सगळं संपलं होतं. अर्धवट जळालेल्या नोटा, अन्नधान्य, घरातील वस्तूंची झालेली राख बघून शेतकऱ्याने हंबरडा फोडला. ही घटना गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथे सोमवारी रात्री आठ वाजता घडली. अखिल वसंत नागापुरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.शार्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अशी लागली आग..

नागापुरे कुटुंब सोमवारी रात्री आठ वाजता दुसऱ्या खोलीत बसून जेवण करत होते.स्वयंपाक घरात त्यांना धूर दिसू लागला. त्यांनी बघितलं तेव्हा आगीचा भडका उडाला होता. सगळं कुटुंब आरडाओरड करीत घराबाहेर पडले. गावकरी मदतीला धावले जो तो आपल्या परीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करु लागला. तब्बल एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळालं.
WWDC 2023 : ॲपलनं आणला जगातील सर्वात स्लिम Macbook Air, पाहा १५ इंच मॅकबुकची किंमत आणि फीचर्स

काय जळालं…

शेतीसाठी अखिल वसंत नागापुरे यांनी पीक कर्ज घेतलं होतं. घरातील मका विकला होता. बचत गटातून काही रक्कम मिळाली होती, असे एकूण चार लाख रुपये घरात होते. आगीत ही संपूर्ण रक्कम जळाली.घरातील सात तोळे सोने, महत्वाची कागदपत्रे, कपडे,गहू, तांदूळ, तुरीची डाळ,मिरची,सोफा जळून खाक झाले. जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
Pune Loksabha: पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत; तात्यांनी थेट जनतेचाच कौल मागितला

शेती उभी कशी करायची ?

शेतीच्या मशागतीला सुरवात झाली आहे. शेती उभी करायला पैशाची जमवाजमव शेतकरी करीत आहेत. शेतीसाठी आणलेले सर्व पैसे जळून गेलेत. त्यामुळे आता शेती कशी उभी करायची या विवंचनेत अखिल नागापुरे आहेत. खरिपाच्या तयारीसाठी जमवलेले पैसे जळून खाक झाले आता ते कसे उभे करायचे असा प्रश्न नागापुरे कुटुंबापुढं उभा राहिला आहे.
डोंबिवलीत भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा, भाजप-शिंदे गटात धुसफूस, पोलीस अधिकाऱ्याला ‘ठाण्यातून’ पाठबळ?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed