• Sun. Mar 15th, 2026
    VIDEO | वटपौर्णिमेच्या पूजेवेळीच झाडाला आग, महिला फेऱ्या मारताना वड पेटला

    कोल्हापूर: आज राज्यात सर्वत्र वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला वडाच्या झाडाची पूजा करत आहेत. अशातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात असलेल्या वडाच्या झाडाला अचानक आग लागली आहे. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निरोधक मशीनद्वारे आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

    या मंदिरात अंबाबाईसह अनेक छोटी मोठी मंदिर आहेत. तसेच वडाचे झाड देखील आहे. यामुळे आज वटपौर्णिमेनिमित्त अंबाबाई मंदिर परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात मंदिरात आल्या होत्या. यावेळी मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला.

    दरम्यान महिला या झाडाखाली मोठ्या प्रमाणात कापूर आणि उदबत्ती लावून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत होत्या. याचवेळी बांधलेल्या दोऱ्याला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.

    लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय
    घटनेची माहिती मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कर्मचारी त्वरित दाखल झाले. त्यांनी लगेचच मंदिरातील अग्निरोधक मशीनच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांना आग विझवताना अडचण निर्माण होत होती. मात्र 15 ते 20 मिनिटानंतर आग विझवण्यात मंदिर प्रशासनाला यश आले आहे.

    बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी… पंकजांनी सांगितली हृदयस्पर्शी आठवण
    तर यामध्ये झाडाचा एक भाग मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर सण असला तरी झाडाच्या जवळ कापूर आणि उदबत्ती लावणे महिलांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *