• Sat. Sep 21st, 2024

धरणाच्या काठावर होते कपडे, त्यात मोबाइल वाजत होता, त्यांनी उचलला, माहिती देताच बसला धक्का

धरणाच्या काठावर होते कपडे, त्यात मोबाइल वाजत होता, त्यांनी उचलला, माहिती  देताच बसला धक्का

सातारा : उरमोडी धरण पात्रात रविवारी दोन युवक पोहण्यासाठी आले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यातच बुडाले. ही माहिती कुटुंबीयांना उशिरा समजल्याने तसेच रेस्क्यू टीमला रात्र झाल्याने शोध घेता येत नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी शोध कार्य घेण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी बारा वाजता एक मृतदेह हाती लागला, तर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान दुसरा मृतदेह हाती आला.याबाबत माहिती अशी, की सातारा येथील सौरव सुनील चौधरी (वय २२), आकाश रामचंद्र साठे (वय २० दोघेही राहणार सदर बाजार सातारा) हे दोन्ही युवक आपल्या दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सायळी गावाच्या हद्दीत असलेल्या झुडपातील रस्त्यातून धरणपात्रात प्रवेश करून त्या ठिकाणी पोहण्यास गेले. त्या ठिकाणी या दोघांव्यतिरिक्त पोहणारे अन्य कोणीही नव्हते. ते पोहत होते त्यापासून काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्या युवकांनी ठेवलेली कपडे तसेच मोबाईल हे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी सौरवचा मोबाईल सतत वाजत होता.

Shubman Gill : ३ शतके, ४ अर्धशतके आणि ३३ षटकार, तरीही शुभमन गिल विराटला मागे टाकू शकला नाही
या ठिकाणी बसलेल्या कुटुंबीयांना सतत फोन वाजत असल्याने त्यांनी तो फोन उचलून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी सौरवची आई विचारत होती, की सौरव कुठे आहे? कोण बोलत आहात? त्या कुटुंबीयांनी उत्तर दिले की हा मोबाईल उरमोडी धरण परिसरातील असून इथे दोन युवक पोहण्यासाठी गेले आहेत. मात्र बराच वेळ झालं ते इकडे परत आलेच नाहीत आणि पाण्यातही दिसत नाहीत. हे ऐकून सौरवची आई पुरती घाबरली व तिने आरडाओरडा करतच इतर सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सौरवचा मोठा भाऊ गौरव व काही मित्र घटनास्थळी आले.

त्यांनी परिसरात पाहणी केली, मात्र काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यांनी ही कल्पना शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला दिली. मात्र तोपर्यंत साडेसात ते आठ वाजून गेले होते. रेस्क्यू टीमने सांगितले की, आम्ही सकाळी लवकर येतो आता फार रात्र झाल्याने शोध कार्य घेता येणार नाही.

४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
सकाळी लवकर स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी शोध मोहीम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोध कार्य घेतले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. नंतर अंबवडे येथील काही युवकांनी शर्तीचे प्रयत्न करून एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो मृतदेह आकाश रामचंद्र साठे या मुलाचा होता. हा मृतदेह सकाळी बाराच्या दरम्यान सापडला.
धक्कादायक! मुंबईहून आई-वडील मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आले, दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली
यानंतर सातारा येथील काही कातकरी व्यक्ती तसेच कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरूच ठेवली होती. यावेळी पाऊसही पडत होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही शोधून काढण्यास यश आले. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed