• Sat. Sep 21st, 2024
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा, पण व्हीप माझ्याच शिवसेनेचा: उद्धव ठाकरे

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज दिलेला निर्णय हा सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडनागडं राजकारण उघड पाडणारा आहे, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मला समाधान वाटते. हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याच्या नव्हता, तर लोकशाही जिवंत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक होता. सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं राजकारण उघडं पाडलं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Supreme Court Verdict Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंचा राजीनामा महागात पडला, शिंदे सरकार वाचलं

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात राज्यपाल महोदयांची भूमिका संशयास्पद आणि अयोग्य असल्याचे म्हटले. या निकालामुळे राज्यपालांचं वस्त्रहरण झाले आहे. आजपर्यंत राज्यपाल पद हे आदराचं होतं, पण भाजपने या यंत्रणेचे धिंडवडे काढले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यपाल पद हे अस्तित्त्वात असावे की नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Supreme Court : सरकार वाचलं, पण कोश्यारींना कोर्टाने झाप-झाप झापलं; तत्कालीन राज्यपालांच्या ३ मोठ्या चुका सांगितल्या!

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही, असे घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. याविषयी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय चुकला का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझी लढाई ही देशासाठी आणि जनतेसाठी आहे.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. देशामध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. विरोधकांना एकत्र करण्याच्यादृष्टीने नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. मी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ठाकरेंपासून राज्यपालांच्या भूमिकेपर्यंत, तगडा युक्तीवाद, पण सरन्यायाधीशांच्या प्रश्नांनी शिंदेंचे वकील पेचात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed