राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती ही टीका करताच तेव्हा उपस्थितांनी आणि त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. खासदार काय शिवसेनेचे आमदार काय एक म्हणतो पाठिंबा देणार एक म्हणतो देणार नाही आणि पण तुमची पक्ष म्हणून काय भूमिका आहे. आज पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले आणि आता का सांगतात जर लोकांची भावना असेल ती आमची भावना, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव यांचा समाचार घेतला.
बरेच विषय तुंबलेत ,नालेसफाई होणे गरजेचे आहे. पावसाळा तोंडावर आलाय सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती गेले काही वर्ष ही परिस्थिती अशी झाली आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही. दुसरीकडे तो राजीनामाचा गोंधळ सुरू होता तो संपला. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण ते प्रश्न आणि उभे राहण्याची कारण हे तुम्ही आहात त्याच त्याच पक्षाला निवडून देऊन त्या पक्षाने अख्खा व्यापार कोकणाचा करून ठेवला आहे आणि तुम्ही तिथेच आहात. मुंबई गोवा महामार्गाचे काम २००७ पासून सुरू आहे कुठे तुमचे खासदार पुढे तुमच्या आमदार त्याच त्याच लोकांना तुम्ही सतत निवडून देताय म्हणून त्याना माहिती काम केलं का आणि नाही काय, तुमच्याबद्दल आपुलकी या लोकांना शून्य आहे. त्यांना फक्त तुमच्या मतांची किंमत आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. यापूर्वी दाभोळला एन्रॉन प्रकल्प आला त्यावेळेलाही विरोध झाला पण जमीन विकली कोणी तुम्ही,मग जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प,नाणार व बारसूलाही तेच झाले तुमच्या जमिनीत कोण येऊन व्यापारी घेतो घेऊन जातात आणि तुम्हाला कळत नाही का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा कोकण आहे ना कोकण तो केवळ एका पर्यटनाच्या विषयावरती अख्खा महाराष्ट्र राज्य पोसू शकतो, इतकी ताकत या कोकण भूमीमध्ये आहे. अख्या देशामध्ये महाराष्ट्रसारखे संपन्न राज्य नाही. नाणार येथील प्रकल्पाला आपणही विरोध केला होता अशा प्रकल्पाची गरज नाही हे मी तेव्हाच सांगितलं होतं पण नंतर लॉकडाऊन आला. या ठिकाणी जागतिक वारसा लाभलेली कोकण शिल्प आहेत आणि त्या परिसरात डेव्हलपमेंट करता येत नाही असं सांगत त्यांनी रिफायनरी प्रकल्पविरोधात आपली भूमिका मांडली.
शरद पवार यांच्या तोंडातून कधीही शिवछत्रपतींचे नाव येत नव्हते. याच पवारांनी राज ठाकरे समुद्रातील शिवछत्रपतींच्या पुतळा विरोध करतो आहे, असं पसरवायला सुरुवात केली. महाराजांचा समुद्रातील पुतळा उभारताना दहा हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा महाराजांनी उभारलेले गडकिल्ले सांभाळा त्यावर खर्च करा. या गडकिल्ल्यांमध्ये शिवछत्रपतींचा विचार आहे. या सगळ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.