• Wed. Sep 16th, 2026

मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरीत जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीला विरोध करताना शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खोचकपणे उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, एरवी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत नाही. पण समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना शेतकऱ्यांशी बोलून आम्ही कसा मार्ग काढला, हे सांगण्यासाठी मी त्यांचा उल्लेख करत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख आहे. पण मंत्री असताना तीन जिल्ह्यांमध्येही त्यांना कोणी ओळखत नव्हते, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. या टीकेला आता एकनाथ शिंदे कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बारसू आणि सोलगावमधील ग्रामस्थांनी चिंता करु नये. आम्ही हा रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादू देणार नाही. सरकारने हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हुकूमशाही मोडून-तोडून काढू, महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Barsu: हुकूमशाहीने कोकणात रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू; उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे बारसू रिफायनरी विरोधकांना बळ मिळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून आंदोलन स्थगित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने बारसूच्या सड्यावर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती. तर दुसरीकडे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली बारसूमध्ये रिफायनरी समर्थकांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे पैसे घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे जाऊ देत नाहीत. ते कोकणाला लागलेला मोठा शाप आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Ratnagiri News: बारसू रिफायनरीविरोधातील लढ्याला मुंबईतून रसद, चाकरमानी तरुण कोकणाकडे निघाले

रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच: उद्धव ठाकरे

लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. आता जे या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत, त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर यावे आणि रिफायनरीचे समर्थन करुन दाखवावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे राजापूरमधील साखरीत दाखल; हेलिकॉप्टरमधून उतरताच ग्रामस्थांची गर्दी

Maharashtra Live News 16th September 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स
Manoj Jarange : ‘जरांगे यांची भाषा आक्षेपार्ह’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, मुंबईला येताना कुटुंबासह जनसमुदायाला अश्रू अनावर
Murlidhar Mohol: मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा, तर दगडूशेठ परिसरातील गर्दीत व्हीआयपी ताफा घुसवणाऱ्यांवर काय? पुण्यात नवा वाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed