त्यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे. तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. पुढील तीन दिवस हीच परिस्थिती पहायला व अनुभवायला मिळणार आहे. भर उन्हात ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होताना पहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असल्याची भावना प्रवाशी नागरिक व्यक्त करत असून यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लगीन सराई सुरू असल्याने वाहतूक कोंडीच्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वर तासनतास थांबावे लागत आहे. आज सकाळपासूनच एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दिवसात अनेकजण सुट्ट्यांचे प्लॅनिंग करत गावी येत असतात. एक्स्प्रेसवे वरची वाहतूक कोंडीमुळे ताटकळत राहावे लागत आहे.
एक्स्प्रेस हाय वे ते रेल्वेचं जाळं, मुंबई-पुण्याला लाजवणाऱ्या प्रकल्पाने नांदेडची ताकद वाढवली
अपघातांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसांपासून मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी आठ वाहने एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला होता. यात कुठलीही हानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय वाहतुकीची कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. दर आठ दिवसातून येथे अपघात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेऊन प्रवास करणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
