• Sat. Sep 21st, 2024
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंनी घेतला लालपरीतून प्रवासाचा आनंद,आई आणि लेकींसह प्रवास

बीड : महाराष्ट्र सरकारनं २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. राज्य सरकारच्या या योजनेला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला प्रवाशांकडून या योजनेचं स्वागत देखील करण्यात आलं. राज्यात एसटीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय एसटीच्या उत्पन्नात देखील वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणारा महिला प्रवासी वर्ग आर्थिक बचतीमुळं एसटीकडे वळला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी एसटी बसमधून प्रवास करुन या योजनेचा आढावा घेतला.

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीड बस स्थानकातील आढावा घेऊन एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केला. राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट दिली आहे.७५ वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत बस सेवा प्रदान केली आहे. याच योजनेचा आढावा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला.

खर्गेंना प्रत्युत्तर देताना भाजप नेत्याची जीभ घसरली, सोनिया गांधींबद्दल अपशब्दांचा वापर, काँग्रेस आक्रमक

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तिकीट काढून बीड ते मयूर अभयारण्य असा सहकुटुंब प्रवास केला. यावेळी त्यांच्या दोन मुली, आई सोबत होत्या. राज्य शासनाने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलंय. ज्या जुन्या बस आहेत. त्यांना लवकरच दुरुस्त करून महिलांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

अजिंक्य रहाणे भावनिक झाला; भारतीय संघात निवड झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया, मी आयुष्यात फार…

महाराष्ट्र शासनानं महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. उन्हाळ्याची सुट्टी आहे, महिलांना, लहान मुलांना बाहेर जावं असं वाटत असतं. त्यामुळं महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं दीपा मुंडे मुधोळ म्हणाल्या. खूप वर्षानंतर एसटी बसमधून प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनात काम करत असल्यानं लांबचा प्रवास करायचा प्रश्न येत नाही, असं त्या म्हणाल्या. मुलींना बसमधून प्रवास करायचा होता, सहकुटुंब प्रवास केला याचा आनंद होत असल्याचं दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या.

बारसू पेटलं, शेतकरी भूमिकेवर ठाम, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, रणरणत्या ऊन्हात लाठीचार्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed