• Sat. Sep 21st, 2024

बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर :के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाने मोठा दावा केला आहे. लवकरच महाराष्ट्रातील ३०० जण बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेतील नगरसेवक आणि आमदारांचाही समावेश असल्याचा दावा पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अशान्नागारी रेड्डी यांनी सांगितलं. तेलंगण राज्यातील नागरिकांसाठी येथील बीआरएस पक्ष साडेचारशे पेक्षा अधिक कल्याणकारी योजना राबवत आहे. देशाची मोठी आर्थिक राजधानीत अशा योजना का राबवल्या जात नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला योजना मिळाव्या शहरांचा विकास व्हावा अशी आमची मागणी आहे, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.बीआरएस पक्ष हा राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असून आमच्या पक्षात येण्यासाठी भाजप शिवसेनेचे आमदार, नगरसेवक संपर्कात असून ३०० जण प्रवेश करणार असल्याचा दावा बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अशान्नागारी रेड्डी यांनी सांगितलं.

बीआरएस पक्षाची २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जमीनदार येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी रेड्डी बोलत होते. या सभेसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी पक्षाकडून गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या जात आहेत.

नागपूरमध्ये थरार; डीजे वाजवण्यावरून होता जुना वाद, तीन तरुणांनी केला हल्ला, तरुण गंभीर जखमी
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि तेलंगणा हे राज्य जवळ जवळ आहेत. या ठिकाणी बेटी रोटी व्यवहार होतो, यामुळे या राज्याशी आमचं जवळचा नातं आहे. यामुळेच या ठिकाणच्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात, शेतकरी वर्गाला योजनांचा लाभ व्हावा अशी बीआरएस पक्षाची भूमिका आहे. यासाठी आपकी बार किसान सरकार हा नारा बिहारी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

तेलंगणा सारख्या छोट्या राज्यांमध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांसाठी तब्बल ४०० पेक्षा अधिक योजना आम्ही त्या ठिकाणी राबवल्या आणि त्यामुळे याचा नागरिक आणि शेतकऱ्यांना फायदा झाला. शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. असाच विकास महाराष्ट्राचा देखील व्हावा अशी भूमिका पक्षाची असल्यास रेड्डी यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
‘महाराष्ट्रातील सरकार नागरिक, शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा देत नाहीत’

भारतामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असताना देखील या ठिकाणी नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. शेतकरी दिवसाला आठ ते दहा जणांच्या आत्महत्या होतात. या ठिकाणचे सरकार नागरिकांनी शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा देत नाही. तेलंगाना प्रमाणे इथल्या सरकारने ६० लाख एकरचे ८० करोड द्या, विवाह साठी कल्याण लक्ष्मी योजना , मिशन भगीरथ चा मिनरल पाणी द्या, रस्ते दुरुस्त करा, शहरांचा विकास करा, पत्रकार लोकांना घरे द्या या सर्व सेवा दिल्या तर बीआरएस पक्ष महाराष्ट्रात कशाला येईल. यामुळे आम्हाला महाराष्ट्रात प्रवेश करावा लागत आहे. या सुविधा या सुविधा इथल्या सरकारने नागरिकांना दिल्या असत्या तर बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसती. यामुळे बीआरएस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून या ठिकाणी आम्ही राजकारण करायला आलो आहोत, सर्कशीसाठी आलो नाही असे देखील पी आर एस पक्षाचे प्रभारी रेड्डी यांनी सांगितलं.

नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य आणि संविधानाची हत्या; शरद पवारांचा हल्लाबोल
शिवसेना-भाजपचे आमदार संपर्कात

तेलंगण राज्यातील मॉडेल महाराष्ट्रात आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना तेलंगाना मॉडेल आवडत असल्यामुळे या ठिकाणचे नेते बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत आतापर्यंत अनेक आमदार खासदारांनी प्रवेश केला. येत्या २४ तारखेला ३०० पेक्षा अधिक जणांचा प्रवेश होणार आहे. यामध्ये ५० जण हे नगरसेवक आहेत. सत्ताधारी शिवसेना भाजपच्या आमदार नगरसेवकांचा देखील आमच्या संपर्कात असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed