• Sat. Sep 21st, 2024
पोहायला गेलेला १७ वर्षीय आमन पाण्यात पडला, अपघात की घातपात? कुटुंबाला वेगळाच संशय

धाराशीव: धाराशीव येथे वेताळनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या आर्थिक देवाणघेवाणीतून एका १७ वर्षीय तरुणाची पाण्यात ढकलून हत्या केल्याची घटणा तुळजापुर शहरात घडली आहे. मुळात हा घातपात आहे की अपघात हे तपासाअंती निष्पन्न होणार आहे.

तुळजापुर शहरातील वेताळनगर येथील आमन फिरोज शेख अंदाजे (वय १७) हा त्याच्या तीन ते चार मित्रांबरोबर पोहायला तुळजापुर तालुक्यातील हंगरगा तुळशिवारात सचिन रोचकरी यांच्या विहिरीवर गेला होता. आमन फिरोज शेख अचानक पाय घसरुन विहिरीत पडला. आमनचा पाय घसरुन विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पण आमनच्या नातलगांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन वेताळनगर तुळजापूर वेताळनगर येथील गणेश संतोष नवगिरे याने आमनला पाण्यात ढकलून जिवे ठार मारलं असल्याचा संशय घेतला आहे.

ठाण्यातील ते अधिकारी एकनाथ शिंदेंना लॉयल राहिले अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, अजित पवारांचा गौप्यस्फोट
आरोपीची आजी (आईची आई) तेजाबाई जाधव यांचे आणि फिर्यादीचे दिर सिराज शेख यांचे आर्थिक देवाणघेवाणीतून काही महिण्यांपूर्वी भांडण झाले होते. फिर्यादीचे घर व्याजाच्या पैशात तेजाबाई जाधव या घेणार होत्या. पण व्यवहार फिसकटल्याने हा व्यवहार झाला नाही. हा राग मनात धरुन आरोपी गणेश संतोष नवगिरे याने आमनचा घातपात केला, अशी तक्रार मयत आमनची आई कलीमा फिरोज शेख (रा. वेताळनगर, ता. तुळजापुर) यांनी दिली आहे.

दिलेल्या तक्रारीवरुन कलम – ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

करोना महामारी संपलेली नाही सतर्क राहा, केंद्राचा ८ राज्यांना इशारा,महाराष्ट्राचाही समावेश, पत्रात काय म्हटलंय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed