• Sat. Sep 21st, 2024

२००९मध्ये षडयंत्र रचलं, गद्दारी केली, आता त्या खासदाराचा टांगा पलटी करू- नरेश म्हस्के

२००९मध्ये षडयंत्र रचलं, गद्दारी केली, आता त्या खासदाराचा टांगा पलटी करू- नरेश म्हस्के

नवी मुंबई : ‘लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय चौगुले शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी ठाण्यातील चरई येथील कार्यालयातून षडयंत्र रचण्यात आले होते’, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केला आहे. ‘गद्दारी करणाऱ्या खासदाराला येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. गद्दारी करणाऱ्या खासदाराचा टांगा पलटी करू’, असा इशारा म्हस्के यांनी ठाकरे गट आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना दिला.सानपाडा येथे बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने पक्षाचे प्रवक्ते व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के यांचा जाहिर सत्कार आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी म्हस्के यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, युवा नेते ममित चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर, माजी उपमहापौर अशोक गावडे, उपजिल्हाप्रमुख जगदीश गवते, ऍड. रेवेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

१११ प्रभागातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पदे केवळ स्वतःसाठी न मिरवता जनतेच्या सेवेसाठी त्याचा वापर करा. जनतेपर्यंत पोहोचून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन जिल्हा प्रमुख चौगुले यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी कालावधीत मुख्यमंत्री शिंदे यांचा महा मेळावा, युवा व महिला सेनेचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहितीही विजय चौगुले यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली, पण भाषणाच्या सुरुवातीलाच किस्सा सांगताना अचानक थांबले!

मुख्यमंत्री आणि सरकारच्या नावाने बोंबलल्या शिवाय विरोधकांना चैन पडत नाही, अशी टीका यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते नाहटा यांनी केली. नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नरेश म्हस्के यांना यावेळी नाहटा यांनी केले.

छोटी-मोठी ऑपरेशन्स मी करतच असतो; डॉक्टरेट मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चौफेर टोलेबाजी

‘… म्हणून ठाकरेंची साथ शिंदेंनी सोडली’

‘नगरविकास मंत्री म्हणून त्याचप्रमाणे करोनाच्या कालावधीत एकनाथ शिंदे यांनी जीव ओतून काम केले. शिंदे यांची वाढती लोकप्रियता उद्धव ठाकरेंना खुपली. त्यानंतर मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांची घुसमट सुरू झाली. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्व. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला काळे लावले आहे. पण मातोश्रीचे युवराज असणारे आदित्य ठाकरे यांचा आव्हाडला मदत करायची, असा फोन आला. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बोलल्यास मातोश्रीवर नेहमी अडवणूक होऊ लागली. करोनाच्या काळात मी महापौर असतानाही मातोश्री, वर्षावरून कामात नेहमी अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्यांची साथ सोडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे नरेश मस्के यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed