• Sat. Sep 19th, 2026
लेकाच्या गाडीवरुन शर्यत पाहायला आले, बैलगाडीची धडक बसली, नको तेच घडलं, एकाचा मृत्यू

सातारा : राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यती सुरु आहेत. बैलगाडा शर्यत प्रेमी मोठ्या उत्साहानं शर्यतींचं आयोजन करत आहेत. बैलगाडा मालक आणि शर्यत प्रेमी मोठ्या संख्येनं स्पर्धांना हजेरी लावताना दिसतात. राज्यात यात्रांचा हंगाम सुरु झाल्यानं त्या निमित्तानं देखील स्पर्धा सुरु झालेल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी अप्रिय घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरताव येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेल्या वळई (ता. माण ) येथील दाजी गणपती काळेल (वय ६२) हे बैलगाडा शर्यत पाहायला आले होते. मात्र, बैलगाडीची धडक बसून ते ठार झाले.

माण तालुक्यात गुढी पाडव्यापासून गावोगावच्या ग्रामदैवताच्या यात्रांचा हंगाम सुरु झाला आहे. दोन दिवसांपासून शिरताव येथील भैरवनाथ ग्रामदैवताची यात्रा सुरु आहे. या यात्रेत बैलगाडा शर्यतीचे रविवारी भैरवनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचे यात्रा कमिटीने आयोजन केले होते. एक आदत एक बैल, एक दुजा एक बैल अशा शर्यती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी विजेत्यांना तीन हजार ते ५१ हजार रुपयापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले होते.

कामं झाली तर श्रेय तुमचं अन् रखडली तर जबाबदारी इतरांची?; शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पुन्हा डिवचलं

राजकीय वातावरण तापणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार, २५७ बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी दाजी काळेल हे वळई येथून संतोष या मुलांसमवेत मोटरसायकलवरून आज दुपारी शिरताव येथील यात्रेस आले होते. बैलगाडा शर्यत पाहताना दाजी काळेल यांना आज सायंकाळी पाचच्या सुमारास या शर्यतीमधील बैलाची धडक बसल्याने ते गंभीर जखमी होऊन मृत झाल्याची घटना घडली. या घटनेची अकस्मात नोंद झाली आहे. तपास म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ करीत आहेत.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!

Maharashtra Live News 19th September 2026 : मशिदीत विराजमान होतो गणराया; कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये ४० पेक्षा जास्त वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा
Pune Crime : सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये बिलावरुन वाद, सर्वांसमोर अपमान झाल्यानं काटा काढायचं ठरवलं; पुण्यातील हरीश गंगावणे प्रकरणाचं कारण समोर
Mumbai-Goa Highway : 17 वर्षांपासून काम अपूर्णच, आता खर्च 5500 कोटींनी वाढला; याच हायवेच्या उद्घाटनाला जाणार नाहीत गडकरी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed