टीकेला उत्तर
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडला दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या बैठकीत लोकप्रतिनिधींना काजू आणि बदाम देण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. राज्यात दुष्काळ पडलाय आणि लोकप्रतिनिधी काजू, बदामवर ताव मारून शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या या टीकेचा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला.
Advocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती‘बदामासाठी बैठक नव्हती’
‘त्या बैठकीला लोकप्रतिनिधी बदाम, काजू खाण्यासाठी गेले नव्हते. ती बैठक काय काजू, बदामासाठी घेतली होती का, असा संतप्त प्रश्न मुंडे यांनी केला. कोणत्याही बैठकीची एक व्यवस्था असते. बैठकीत चहापाणी, काजू, बदाम दिले जातात. काही गोष्टी वाढल्या जातात. तिथे कोणी काही काजू, बदाम खाण्यासाठी जात नाही. मुळात काजू, बदाम हा काही महत्त्वाचा विषय नाही. बैठक शेतकऱ्यांसाठी होती. तो विषय महत्त्वाचा आहे. निरर्थक वाद निर्माण करू नये,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक येते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे काम करते. आम्ही निवडणुका नसताना वीजमाफी केली. कर्जमुक्ती दिलीच ना? शेतकऱ्यांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जागरुक राहून उपाययोजना करीत आहोत. ३२ हजार कोटींची कर्जमाफी, वीजबील माफी दिली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कसे घेता येईल, बी बियाणे कसे पोहोचवता येईल, हा प्रयत्न आहे; परंतु निसर्गाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत. अन्न धान्य, चारा आणि पाण्याची व्यवस्था करीत आहोत,’ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
Sahil Wakode : माझ्या साहिलला त्यांनी टॉर्चर करुन मारलं; IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं, आईचे उद्विग्न आरोपवेगवेगळी आंदोलने सुरू
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सध्या आरक्षणावर वेगवेगळ्या समाजाची आंदोलने सुरू आहेत. धनगर, बंजारा, आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचे वेगवेगळ्या धर्तीवर आंदोलन सुरू आहे. यामुळे समाज विभाजित होतो. ही अस्वस्थता खालपर्यंत जाते. आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी जालना, बीडला जाणार’-पंकजा मुंडे
‘एनडीआरएफ’चे काही नियम आहेत. त्यात परतीच्या पावसाच्या कधीपर्यंत पंचनामे करायचे हे ठरलेले आहे; परंतु त्यावर आम्ही थांबलेलो नाही. कृषिमंत्र्यांनी आज आढावा घेतला आहे. मी जालना आणि बीडमध्ये जाऊन पाहणी करणार आहे. पंचनामे आज आणि आठ दिवसांनी केल्याने फरक पडणार नाही. आम्ही आधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहे,’ असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
