मलेशियाला बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून पुण्यातील व्यावसायिक मुंबईतील विमानतळावर पोहोचला. विमानात बसण्याआधी त्याच्या सोबत नाट्यमय प्रसंग घडला आणि सगळा बेत फसला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पत्नी सोबत खोटं बोलल्यानं पुण्यातील व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं. एका बिझनेस ट्रिपच्या निमित्तानं मलेशियाला जात असल्याचं सांगून पुणेकर निघाला. पण प्रत्यक्षात तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत सुट्टीसाठी मलेशियाला जात होता. पण पासपोर्टमुळे झालेला घोळ आणि पत्नीनं पोलीस ठाण्यात जाऊन केलेली अपहरणाची तक्रार यामुळे त्याचा डाव उधळला.
पुणेकर व्यावसायिक १४ सप्टेंबरला त्याच्या मैत्रिणीसोबत विमानतळावर पोहोचला. मैत्रिणीचा पासपोर्ट जुना होता आणि तो हरवल्याची तक्रार तिनं नोंदवलेली होती. तोच पासपोर्ट तिनं इमिग्रेशन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तिला रोखलं. या पासपोर्ट सोबत प्रवास करता येणार नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढील कार्यवाहीच्या भितीनं त्याची बोबडी वळली. पत्नी समोर बिंग फुटू नये यासाठी त्यानं इमिग्रेशनमधील अडचणींची खोटी कहाणी रचली. ही कहाणी सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समोर आणली.
४६ वर्षांच्या व्यक्तीच्या पुण्यात लॉण्ड्रीचा मोठा व्यवसाय आहे. विमानतळावर चेकिंग सुरू असताना मैत्रीण पासपोर्टमुळे अडकताच व्यावसायिकानं पुढचा प्रवासच रद्द केला. त्यानं भितीनं मोबाईल स्विच्ड ऑफ केला. त्यानंतर तो त्याच्या प्रेयसीसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला. तिथे असलेल्या लँडलाईनवरून त्यानं पत्नीला कॉल केला. इमिग्रेशनच्या समस्येमुळे मला माझा मोबाईल जमा करावा लागत असल्याचं त्यानं पत्नीला सांगितलं.
दुसऱ्या दिवशीही त्यानं पत्नीशी अतिशय त्रोटक संवाद साधला. त्यावेळीही त्यानं इमिग्रेशनची खोटी कहाणी ऐकवली. त्यानंतर त्याचा मोबाईल पूर्णपणे बंद झाला. बराच वेळ पतीशी संपर्क न झाल्यानं पत्नी घाबरली. तिनं पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू करताच प्रकरण उघडकीस आलं. बायकोसमोर सत्य येऊ नये यासाठी व्यावसायिकानं सगळी कहाणी रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
पत्नीनं अपहरणाची तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्यावसायिक सहार पोलीस ठाण्यात पोहोचला. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं. पत्नीला सत्य समजू नये यासाठी इमिग्रेशनची कहाणी रचल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. त्यानंतर या सगळ्या नाट्यमय प्रकरणावर पडदा पडला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा