महेश पाटील, नंदुरबार : पैशांच्या वादातून मुकेश अर्जुन चौधरी यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी घेऊन नंदुरबारात आलेल्या दोन आंतरराज्य सुपारी किलरना नंदुरबार शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. संशयितांनी मुकेश चौधरी यांची रेकी करून त्यांच्या कारवर नंदुरबार-चौपाळा रस्त्यालगत फायरिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, कारचा वेग अधिक असल्याने गोळी लक्ष्याला न लागता हवेत गेली. त्यानंतर पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले.
ही कारवाई १८ सप्टेंबर २०२६ रोजी नंदुरबार शहर पोलिसांनी केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे देवेंद्र गोकुळदास बैरागी (वय ३४, रा. फाजरपुरा, गाडीहाटा चौकाजवळ, उज्जैन, मध्यप्रदेश) आणि अभयासिंग मोहनसिंग चव्हाण (वय ४६, रा. घर क्र. २२१, निकास चौक, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी आहेत. या कटातील सत्तार मोहन ठाकरे (रा. म्हसावद) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
नंदुरबार शहरातील तंत्रनिकेतनच्या बाजूला असलेल्या चौपाळे रस्त्यावर फायरिंग झाल्याची माहिती १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता नंदुरबार शहर पोलिसांना मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी आरोपींना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हणमंत गायकवाड यांनी पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोउपनि. भुनेश मराठे आणि पोउपनि. अमोल देशमुख यांनी पथकासह शहरात संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांना छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत दोन संशयित विनानंबर प्लेटच्या मोटारसायकलवर आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. संशयितांकडे पिस्तुले असल्याची माहिती असूनही पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी जीवाची पर्वा न करता शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
Disha Salian Case : मातोश्रीच्या उंबरठ्यावर अब्रुनुकसानीची नोटीस, ठाकरेंना घरी जावूनच नोटीस का दिली? सतीश सालियन यांचे धमकीचे आरोपपंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, तीन मोबाईल फोन आणि १ हजार ८०० रुपये रोख असा मुद्देमाल मिळून आला. याशिवाय म्हसावद-शहादा-नंदुरबार-निझर-तळोदा-अक्कलकुवा आदी मार्गांचा हस्तलिखित नकाशाही पोलिसांना मिळाला.
पैशांच्या वादातून हत्या करण्याचा कट
पिस्तुले, काडतुसे, नकाशा आणि विनानंबर प्लेट मोटारसायकल यामुळे पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यापासून त्यांच्याकडे असलेली पिस्तुले सत्तार ठाकरे (रा. म्हसावद), पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ (रा. शहादा) आणि रवि डाबी (रा. उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्या सांगण्यावरून आणण्यात आली होती.
Advocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती
हत्येची सुपारी का दिली?
मुकेश अर्जुन चौधरी यांचा पंकज मिश्रा आणि सत्तार ठाकरे यांच्याशी पैशांवरून वाद असल्याने त्यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
रेकी करून कारवर फायरिंग
संशयितांनी मुकेश चौधरी यांची रेकी केली. त्यानंतर त्यांच्या काळ्या रंगाच्या कारचा पाठलाग करून नंदुरबार-चौपाळा रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत ते थांबले. मुकेश चौधरी यांचे वाहन जवळ येताच आरोपींनी त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कारच्या दिशेने फायर केले. मात्र, वाहनाचा वेग अधिक असल्याने गोळी लक्ष्याला लागली नाही आणि हवेत गेली.
गोळीबाराचा प्रकार लक्षात न आल्याने मुकेश चौधरी पुढे निघून गेले. त्यानंतर आरोपी शहरात परतले आणि छत्रपती हॉस्पिटलच्या मागील भागात थांबून पुन्हा मुकेश चौधरी भेटल्यास हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
हत्या झाल्यानंतर रायगडला मुक्कामाचे नियोजन
पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मुकेश चौधरी यांची हत्या केल्यानंतर सत्तार ठाकरे आणि पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ यांच्या सांगण्यावरून आरोपींनी बेहरा शेठ, रा. रायगड, ता. उच्छल, जि. तापी (गुजरात) यांच्या घरी मुक्काम करण्याचे नियोजन केले होते. याबाबत बेहरा शेठ यांच्याशी चर्चा झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपींना नकाशा तयार करुन दिला होता
मुकेश चौधरी यांची हत्या करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन आरोपींना देण्यात आले होते. हत्येच्या कटासाठी कागदावर विविध मार्गांचे नकाशेही तयार करून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान या कटात सत्तार मोहन ठाकरे, रा. म्हसावद याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. देवेंद्र गोकुळदास बैरागी, अभयासिंग मोहनसिंग चव्हाण आणि सत्तार मोहन ठाकरे या तिघांना अटक करण्यात आली असून, कटातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोपी विविध राज्यांशी संबंधित
अटक करण्यात आलेले संशयित मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राशी संबंधित असून, या प्रकरणाला आंतरराज्य गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून या कटातील इतर व्यक्तींचा तसेच आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास केला जात आहे.
Crime News : एजंटची इतकी हिंमत? स्वत:ची कार सांगत 4 लाख 70 हजारात विकली, नंतर मध्यरात्री पळवून नेलीही कारवाई पोउपनि. भुनेश मराठे, पोउपनि. अमोल देशमुख, पोहेकॉ. प्रशांत पाटील, जगदीश पाटील, विशाल नागरे, विनोद जाधव, राजेश येलवे, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, राजेंद्र धनगर, जितेंद्र तोरवणे, पोकॉ. राजेंद्र कटके, आनंद मराठे, रुपेश पगारे, ललित गवळी, राहुल राठोड, अमित भरवाड, नरेंद्र पाडवी, अनिल वसावे, विवेक ठाकरे, विनोद महाजन, विद्धेश्वर बिरारी, संदीप सदाराव आणि मपोकॉ. निंबा वाघमोडे यांनी केली.
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. अमोल देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा