छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी हॉस्पिटल परिसरात उपचारासाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही नराधमांना बेगमपुरा पोलिसांनी 24 तासांच्या आत गजाआड केले आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत आरोपीच्या हाताचा कडाडून चावा घेतल्यामुळे नराधमाचा डाव उधळला गेला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रोहन जगदिश रिडलॉन (वय २४, रा. मुंबई), विशाल प्रकाश चावरिया (रा. घाटी क्वार्टर्स, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, वैजापूरची मूळ रहिवासी आहे.
Disha Salian Case : मातोश्रीच्या उंबरठ्यावर अब्रुनुकसानीची नोटीस, ठाकरेंना घरी जावूनच नोटीस का दिली? सतीश सालियन यांचे धमकीचे आरोप२० वर्षीय तरुणी १८ सप्टेंबर रोजी रात्री रिक्षाने जात असताना अचानक ब्रेक लागल्याने तिच्या उजव्या डोळ्याला रिक्षाच्या मीटरचा मार बसला होता. डोळ्याचा त्रास वाढल्याने १९ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ती घाटी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी डोळे तपासल्यानंतर तिला पुढील तपासणीसाठी वॉर्ड क्र. १५ आणि नंतर वॉर्ड क्र. ११ मध्ये जाण्यास सांगितले.
तरुणी वॉर्ड क्र. ११ कडे जात असताना, सोबत असलेल्या विशाल चावरिया आणि रोहन रिडलॉन यांनी तिला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने SSB बिल्डिंगजवळ आणले. तिथे वॉचमनसमोरच तिला हाताच्यापटाने मारहाण करत आणि धमकी देऊन बळजबरीने स्कुटीवर बसवले. त्यानंतर तिला एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले.
Advocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती
तरुणीने प्रतिकार करत घेतला कडाडून चावा
टेरेसवर गेल्यावर विशाल चावरिया खाली थांबला, तर रोहन रिडलॉन याने तरुणीला पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली आणि रोहनच्या हाताचा कडाडून चावा घेतला. अचानक झालेल्या या आक्रमक प्रतिकाराने घाबरलेल्या आरोपीने तिला सोडले आणि ती कशीबशी जीव वाचवून पळाली. यानंतर तिने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड, पोलीस अंमलदार उमेश ठाकूर, उमेश चव्हाण आणि संदीप सोर यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पथकाने जुबली पार्क परिसरात लपून बसलेल्या विशाल चावरियाला तात्काळ ताब्यात घेतले.
Nandurbar Crime : 5 लाखांची सुपारी घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न, नंदुरबारातलं चक्रावून टाकणारं प्रकरणदुसरीकडे, मुख्य आरोपी रोहन रिडलॉन हा मुंबईचा रहिवासी असल्याने तो पोलिसांना चकवा देऊन जालना रेल्वे स्थानकावरून ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ने मुंबईला पसार होण्याच्या बेतात होता. तो जालन्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर उतरून रेल्वे स्टेशनकडे जात असतानाच बेगमपुरा पोलिसांच्या पथकाने त्याला बस स्थानकातच अटक केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा