मनोज जरांगे पाटील यांनी एकट्यानेच मुंबई गाठण्याची घोषणा केली आहे. मराठा आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जरांगेंनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकणार, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. मात्र यासोबतच जर कुणी अडवलं तर लाखो मराठे बिनापरवानगी मुंबईत घुसतील, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला.