मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या चौकशी केली जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या मराठा उद्योजकांची चौकशी केली जात असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. यावरुन जरांगे यांनी सरकारला इशारा दिला. “श्रीमंत लोक आंदोलनात मदत करतात म्हणून सरकार त्यांना अडकवत आहे. सरकार त्यांना अडचणीत आणणार आहे का? सगळ्या समाजात श्रीमंत लोक असतात. ते समाज अडचणीत आल्यानंतर मदत करतात. त्यात चुकीचं काय? निवडणूकीत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून मदत घेत नाही का? मग पैसे वाटण्यासाठी कुठून आणता?”, असे सवाल मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
“आम्हाला निरोप आला मंत्र्यांसोबत चांगले संबंध ठेवा. नाही ठेवत आम्ही चांगले संबंध. शिवसेना सोडून तुम्हाला गद्दारीचे डाग लागल्यानंतर हे डाग पुसण्यासाठी मराठे लागतात. निवडून यायला मनोज जरांगे आणि मराठा समाज लागतो. आता आम्ही बोललेली भाषा शिवराळ वाटते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चांगले संबंध नसले तरी आमचं काहीही होऊ शकत नाही”, असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.
ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा
“आंदोलन करायला मदतीचा हात घ्यावाच लागतो. मराठे मदत करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहायला हवेत. आंदोलन चालवण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली नाही तर आंदोलन चालवायचं कसं? माझ्या जवळच्या लोकांची चौकशी लावता. मग तुम्हाला मदत करणाऱ्यांची चौकशी कशी होत नाही ते मी बघतो, ईडीच्या कार्यालयाला घेराव घालतो”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
Amruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य“मला गुंतवा आणि जवळचे गुंतवा. मी माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं आहे की, तुम्ही माझ्यासोबत राहा अथवा राहू नका. मी माझं आंदोलन सुरू ठेवणार, मी मंत्र्यांना चांगलं बोलणार नाही. माझी जात महत्वाची आहे. MPSC चा प्रश्न निकाली काढा. माफी मागतो. शिवराळ भाषेतील सगळे शब्द मागे घेतो. सोडवा सगळे प्रश्न”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
मुंबईच्या दिशेला कधी निघणार?
“आम्ही 15 सप्टेंबरला मुंबईकडे सकाळी 11 वाजता निघणार आहोत. सरकारला मते लागतात. पण प्रश्न सोडवायचे नाहीत. आमचे लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन होईल. 19 सप्टेंबरला मुंबईत उपोषण सुरू होईल. अनेक भागात आज पाऊस झाला आहे. शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे आंदोलनात ऊर्जा मिळेल. पावसामुळे चैतन्य मिळालं आहे. शेतीकामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुंबईत या आंदोलनात जास्त लोक येतील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Nagpur News : हायकोर्टाचे विश्वास नांगरे पाटील यांना महत्त्वाचे निर्देश, डीजे प्रकरणावर कोर्टात काय-काय युक्तिवाद?
मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावर जरांगे काय म्हणाले?
“मंत्री उदय सामंत काय म्हणाले ते मला माहीत नाही. गेल्यावर्षी पण गणेशोत्सव होता. तुम्ही वर्षभर काय केलं? आमदार प्रसाद लाड या लढ्यात आल्यापासून देखील आम्ही सरकारला वेळ दिला. आजपासून पुन्हा 8 दिवस सरकारकडे वेळ आहे. संधी देऊनही तुम्ही चूक करता. तुम्हाला 3 वर्ष संधी दिली. मग मुंबईत येऊ नका असं तुम्ही कसं म्हणून शकता? सरकारची प्रवृत्ती नीच आहे. तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देणार, शनिवारी-रविवारी चौकशी लावता? एवढे ॲक्टीव तुम्ही कधीपासून झालात? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता बाईच्या पदराआड जाऊन काम करू लागला आहे”, असा घणाघात जरांगे यांनी केला.
जरांगे यांचा मंत्री बावनकुळे यांचा एकेरी उल्लेख करत निशाणा
“तुमच्याकडून आमचं काहीही वाकडं होत नाही. तुला आम्ही आमदार प्रसाद लाड यांच्यामुळे सुट्टी दिली. तुम्ही आमच्या सगळ्या संपत्त्या घ्या. आंदोलन काळातच चौकशा का? बावनकुळे तू सावध राहा. छगन्या सांगतो ना, बाई नाराज झाली. बाईच्या माध्यमातून दिसतं ना. माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला. हे महाराष्ट बघतोय ना”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
“कोणती शिवराळ भाषा? नाकर्तेपणा सांगा तुमचा. ईडी चौकशी लावता आणि तुमच्या पक्षात घेता. ही तुमची नामर्दगी. शिवराळ भाषा म्हणजे काय? 3 वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगला बोललो, त्याचं काय? आता वाईट वाटतं. मला मराठ्यांची गरज आहे. मी नेत्यांकडून बोलत नाही. तुम्ही अन्याय करूनही अन्याय केला नाही म्हणायचा का? आमच्या मराठ्यांवर शिंदेंच्या मंत्र्याने अन्याय केला आहे. तुम्हाला पद घ्यायचे असतील म्हणून तुम्ही चांगले म्हणता”, असं जरांगे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा