केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. भाजप आणि एनडीएशासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा लागू करु, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सेवा संकल्प अभियान राबवणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सेवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. तसेच सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती या अभियानातून दिली जाणार आहे. एनडीए सरकारने केलेल्या विविध विकासकामे आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती देत असताना अमित शाह यांनी मोठी घोषणा केली. 2029 आधी देशातील एनडीशासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करु, अशी घोषणा अमित शाह यांनी केली.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
“राष्ट्रीय सुरक्षेत कलम 370 आणि कलम 35 (अ) हटवण असंभव मानलं जात होतं. रक्ताचा एक थेंब न सांडता, एकही गोळी न चालवता, कलम 370 आज भूतकाळ म्हणून उभे आहे. काश्मीर पूर्णपणे भारतासोबत जोडलेला आहे. तीन तलाक कायदा करुन मुस्लीम महिलांना समान अधिकार दिला. अनेक राज्यांत आम्ही समान नागरी कायदा इन्ट्रोड्यूस केला आहे. मला विश्वास आहे की, भाजप-एनडीए शासित 21 राज्यांमध्ये आम्ही 2029 सालाआधी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करु”, अशी घोषणा अमित शाह यांनी केली.
Manoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा“भारताने पाच दशकांपासूनच्या नक्षलवादाला समाप्त केलं आहे. उत्तर पूर्वेत 14 पेक्षा जास्त शांती करार झाले आहेत आणि 9 हजार पेक्षा जास्त लोकांना सरेंडर करुन आज उत्तर-पूर्वेला विकासाच्या रस्त्यावर घेऊन गेलो आहोत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाप्रती शुन्य सहिष्णूताची स्थिती स्थापित केली आहे आणि अनेक क्षेत्रांना सुरक्षेला प्राधान्य देण्याचं काम झालं आहे”, असं अमित शाह म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्षे कारकीर्द पूर्ण केली आहे. राज्याच्या आणि देशाच्या प्रमुख पदावर सलग 25 वर्षे राहण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. गेली 12 वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून ज्या प्रकारची प्रगती त्यांनी केली आहे ती आपण जवळून पाहिली आहे. म्हणूनच ही 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक निर्णय सर्वांनी मिळून घेतला आहे. मोदींच्या प्रमुख पदांवरील 25 वर्षे झाल्याच्या प्रत्यर्थ सेवा संकल्प अभियान चालवायचा”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Amruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य“मोदींच्या एकूण कारकीर्दीत सेवाभाव हा त्यांच्या राजकारणाचा स्थायी भाव राहिलेला आहे. राजकारणापेक्षा सेवाकारण आणि गरीब कल्याण अजेंडा त्यांनी सातत्याने चालवला आहे. त्यामुळे हे निमित्त साधून सरकार आणि पक्ष जनतेमध्ये जावून सेवेची कामे करतील, अशाप्रकारची संकल्पना तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचा एकत्रित शासन निर्णय काढलेला आहे. हा प्रत्येक कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणासाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा आहे. त्यासोबत समाजात मोदींच्याप्रती आत्मीयता प्रकट करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे”, अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा