• Thu. Sep 10th, 2026

Pune MPSC Student kidnap : मैत्रिणीशी बोलल्याच्या वादातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : मैत्रिणीशी संवाद साधल्याच्या वादातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याचे मध्यरात्री अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात घडली. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अवघ्या ५३ मिनिटांत पाठलाग करून तरुणाची सुखरूप सुटका केली, तर दोघा संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ​प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मध्यरात्री तरुणाचे अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण १२:३० वाजण्याच्या सुमारास ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून (क्रमांक MH 12 9696) तरुणाचे बळजबरीने अपहरण झाल्याचा निरोप आला. माहिती मिळताच पुणे पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवून नाकाबंदीचे आदेश दिले.

५३ मिनिटात तरुणाची सुटका

संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी रात्री १:२३ वाजताच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर गाडी अडवून प्रसादला आरोपींच्या तावडीतून सोडवले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक) व किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, माळशिरस, सोलापूर) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

Maharashtra TimesNitin Gadkari : मला लाज वाटते, मुंबई-गोवा हायवेला इतका उशीर झालाय, उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींची घोषणा

पूर्ववैमनस्यातून मारहाण करुन पळवून नेलं

​प्राथमिक तपासानुसार, प्रसाद सूर्यवंशी आणि संशयित आरोपी सागरची एक मैत्रीण दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. प्रसाद संबंधित तरुणीशी सतत संपर्कात असल्याने सागरच्या मनात राग होता. याच पूर्ववैमनस्यातून सागरने साथीदारांसह प्रसादला मारहाण करत त्याच्याच वाहनातून जबरदस्तीने पळवून नेले होते. ​

सुटकेनंतर पीडित तरुणाची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चार जणांचा सहभाग असून ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.

पुण्यातच अन्य परीक्षार्थीने आयुष्य संपवलं

दुसरीकडे, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने आर्थिक विवंचना आणि परीक्षेत सातत्याने येत असलेल्या अपयशातून गळाफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार सदाशिव पेठेत घडला. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २८, रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. त्याने विविध स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. मात्र, त्याला यश मिळाले नव्हते.

Maharashtra TimesAnurag Upadhyay : कॉर्पोरेटची संधी सोडून लष्करात, कर्नल अनुराग उपाध्याय स्ट्रोकनंतर मदतीच्या प्रतिक्षेत, मज्जासंस्थेवर मोठा आघातजीव देण्यापूर्वी त्याने दोन पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आर्थिक अडचणी, घेतलेले पैसे आणि परतफेडीबाबतची माहिती; तसेच संबंधित व्यक्तींची नावे लिहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही नोट जप्त केली असून, त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज असल्याचे त्यात नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.