• Sun. Sep 6th, 2026

प्रवीण लोणकर, नागपूर : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने धरणांतील जलसाठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ६१.८ टक्के पाऊस नोंदवला गेला. परिणामी जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के कमी जलसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील पिकांनाही याचा फटका बसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी नागपूर जिल्ह्यात पाऊस कमी पडला. पेंच पाटबंधारे विभाग ांतर्गत येणाऱ्या तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी याच काळात सुमारे ९० टक्के जलसाठा होता. यंदा तो केवळ ६० टक्क्यांच्या आसपास आहे. पाटबंधारे विभाग दक्षिण अंतर्गत मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ९५ टक्के जलसाठा होता; यंदा तो ५५ टक्क्यांवर आला आहे. लघु सिंचन प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ९३ टक्के जलसाठा होता, यंदा ७२ टक्के आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांचा विचार करता गेल्यावर्षी ९१.११ टक्के जलसाठा होता; यंदा तो ५९.४१ टक्के आहे.

Dahi Handi 2026: दहीहंडीवेळी धक्का लागण्यावरून युवकांमध्ये राडा; पोलिसांनी दोघांना बाहेर काढले, डीजेच्या आवाजातही नियमांची चर्चारब्बीचे पीक अडचणीत

सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नसला तरी रब्बी हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिला. विहिरींनाही पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे. सोयाबीनसाठी शेवटचा पाऊस महत्त्वाचा असतो. पाऊस आला नाही तर दाणे भरले जाणार नाहीत आणि उत्पादन घटू शकते. कापूस आणि तुरीच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra TimesYavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीसकॅरीओव्हरचे पाणी वापरावे लागेल

पिण्याच्या पाण्यासाठी सिंचन विभाग आधीपासून राखीव साठा ठेवतो. पुढील वर्षीही पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी हा साठा जपावा लागतो. मात्र, यापुढेही पाऊस झाला नाही तर कॅरीओव्हरचे पाणी वापरावे लागू शकते, असे सिंचन विभागाकडून सांगण्यात आले. यावर्षी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असली तरी महापालिकेने गळती रोखणे आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

धरणांची स्थिती अशी…

आकडे टक्केवारीत

धरणाचे नाव– यंदा– गेल्यावर्षी

मकरधोकडा– १८.५६%– १००%

खेकरानाला– ४६%– ९३%

वडगाव धरण– ५५.३०%– ९७%

पांढराबोडी– ५५.८३%– १००%

नांद धरण– ५५.९०%– ९८.२५%

तोतलाडोह– ५६.९९%– ८९.४३%

वेणा– ६४.३५%– ९३%

खिंडसी– ६६.४८%– ८१.२७%

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed