• Sun. Sep 6th, 2026

Dharashiv Crime : आईसह दोन लेकरं कुशीत गेली, 4 दिवसानंतर लेकीची मृत्यूशी झुंज अपयशी, अश्विनी पौळच्या तिसऱ्या मुलीचाही करुण अंत; नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट

Dharashiv Wrestler Ashwini Paul Death Case : राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ हिच्या तिसऱ्या मुलीचा देखील मृत्यू झाला आहे. वीरा नावाच्या अडीच वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू होते. मात्र, तिने चार दिवसानंतर आपला जीव सोडला.

पैलवान अश्विनी पौळ तिसर्‍या मुलीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : धाराशिवच्या नळदुर्ग येथील उपळी बुर्जावरून अश्विनी पौळ या महिलेनं तीन मुलांसह उडी मारून आत्महत्या केलेल्या दुर्दैवी घटनेत आता आईसह तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. धाराशिव येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूची झुंज देणाऱ्या वीरा पौळ हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

वीरा हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं

तिची प्रकृती गंभीर असल्यानेवीरा हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. या घटनेत अश्विनी पौळ अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी असलेल्या क्रांती पौळचा त्याच रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता या घटनेत चौथा मृत्यू झाला आहे.

Maharashtra TimesYavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू

दरम्यान, अश्विनी पौळ आणि तीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले पती मनोहर पौळ व सासरा अंकुश पौळ यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं 9 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली होती. घटनेत अश्विनी पौळ आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या अडीच वर्षांची मुलगी क्रांती पौळ हिचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देत असलेली क्रांतीची जुळी बहीण वीरा पौळ हिचादेखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले

अश्विनी पौळ या महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीपटू होत्या. 2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर 2008 आणि 2009 मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कामगिरी केली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके मिळवली होती.

Maharashtra Times‘उलगुलान’ आता मुंबईकडे! मोर्चा काढण्याचा आदिवासी आंदोलकांचा निर्णय, सचिव-आयुक्त हटविण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम

लेकराच्या तोंडात चॉकलेटचा तुकडा

अश्विनी पौळ यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते. पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं वडिलांनी सांगितलं होतं. अश्विनी पौळ या केक घेऊन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. मुलांसह आगोदर केक कापला आणि त्यानंतर नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून पहिले मुलांना फेकलं, त्यानंतर स्वतः उडी मारली होती. किल्ल्यात केक कापायला बंदी असल्यानं केक आतमध्ये घेऊन जाता आला नाही. त्यामुळे अश्विनी पौळ यांनी बाहेरच केक कापला होता. यानंतर किल्ल्यात असलेल्या छोट्या दुकानातून मुलांसाठी चॉकलेट विकत घेतले. ज्यावेळी अश्विनी पौळ यांचा मुलगा अजिंक्य याचा मृतदेह हाती लागला तेव्हा त्याच्या तोंडात चॉकलेटचा तुकडा होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा