नागपूर : नागपूरच्या बडकस चौकात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीवेळी उत्साहाचे वातावरण असतानाच कार्यक्रमाच्या अखेरीस काही युवकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच मारामारीत झाले. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत दोन युवकांना कार्यक्रमस्थळाबाहेर काढले, तर इतर युवकांना तेथून हाकलून लावले. कार्यक्रम संपत असताना ही घटना घडली. या प्रकरणात संबंधित युवकांविरोधात पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या उत्सवाची आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे डीजेच्या वापराची. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वापराबाबत निर्बंध घातले असताना बडकस चौकातील दहीहंडीमध्ये डीजे वाजवण्यात आला. मात्र, दरवर्षीप्रमाणे मोठ्या आवाजात डीजे न वाजवता निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करूनच डीजे सुरू ठेवण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. पोलिसांनीही आवाजाची मर्यादा पाळण्याच्या अटीवर डीजेला परवानगी दिल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या दहीहंडी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे बडकस चौकातील दहीहंडी कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले होते. गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेतला आणि परिसरात मोठी गर्दी झाली.
दरम्यान, कार्यक्रम सुरू असताना डीजेचा आवाज परिसरात ऐकू येत होता. मात्र, आयोजकांनी आवाजाची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडूनही कार्यक्रमस्थळी ध्वनीपातळीवर लक्ष ठेवण्यात आले. संध्याकाळी सातच्या सुमारास ध्वनीपातळी सुमारे 80 ते 82 डेसिबल इतकी नोंदवल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमस्थळी लेझर आणि तीव्र प्रकाशाच्या लाईट्सचाही वापर झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून नियमांचे उल्लंघन होत नाही ना, याची पाहणी केली.
याच दरम्यान कार्यक्रम संपत असताना काही युवकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर अचानक मारामारी सुरू झाली. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन युवकांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळाबाहेर काढले, तर इतरांना तेथून हुसकावून लावण्यात आले. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनुचित प्रकार टळला.
दरम्यान, ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या इतर दहीहंडी मंडळांवर पोलिसांकडून कारवाईची शक्यता असून, संबंधित मंडळांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बडकस चौकातील दहीहंडीमध्ये डीजे वाजला असला तरी तो नियमांच्या चौकटीत होता का, याकडे आता लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा