Pune News: आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याने त्याच्या चौकशीतून या हत्याकांडामागील आणखी काही बाजू आणि पुरावे समोर येण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट; डिलिट केलेले चॅट रिकव्हर झाल्याने केसला कलाटणी(फोटो– Lipi)
पुणे : लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाला दरीत ढकलून दिलेल्या धक्कादायक हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आता त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या हत्याकांडात झालेली ही तिसरी अटक असून, कट माहीत असूनही पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी माहितीनुसार, चेतन आणि सियाने रचलेल्या संपूर्ण कटाची कल्पना रितेशला आधीपासूनच होती. १८ जून रोजी केतनला संपवण्यासाठी दोघांनी रितेशलाही लोहगडावर सोबत येण्याची गळ घातली होती; मात्र त्याने प्रत्यक्ष जाणे टाळले. गुन्हा घडल्यानंतरही तो आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. स्वतःचा सहभाग लपवण्यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलिट केले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे चॅट्स रिकव्हर करताच त्याचे बिंग फुटले.
अटक करण्यात आलेला रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तिघेही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. पोलिसांनी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील ‘सक्सेस ग्रुप’ या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक असलेला २६ वर्षीय केतन अग्रवाल याचा २० वर्षीय सिया गोयल हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात दोघांचा विवाह निश्चित झाला होता. मात्र, १८ जून २०२६ रोजी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून सियाने केतनला ट्रेकिंगसाठी लोहगडावर नेले. तेथे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला थेट कड्यावरून खोल दरीत ढकलून दिले.
सुरुवातीला केतनचा पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव या दोघांनी रचला होता. मात्र, गडावरील सीसीटीव्ही तपासताना चेतन हुडी घालून संशयास्पदरीत्या फिरताना आढळला आणि घातपाताचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच, प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असल्यानेच काटा काढल्याची कबुली सिया आणि चेतनने दिली. सध्या हे दोघेही येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा