• Sat. Sep 5th, 2026

Toll Waiver:गणेशोत्सवाला अवघे मोजके दिवस बाकी असताना गावी जाणाऱ्या प्रत्येकाची लगबग सुरू झाली आहे. अशातच राज्यसरकारकडून दरवर्षी गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येते परंतु अजून त्याची घोषणा झालेली नसल्याने पासवाटप लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
कुणाल लोंढे, पनवेल: गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध भागांत गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारकडून दर वर्षी टोलमाफी दिली जाते. मात्र, या टोलमाफीचा निर्णय गणेशोत्सवाच्या अवघ्या काही दिवस आधी जाहीर केला जातो आणि त्यानंतर पासवाटप सुरू होते.

त्यामुळे अनेक सर्वसामान्य गणेशभक्त या सवलतीपासून वंचित राहतात. टोलमाफीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्णय लवकर जाहीर करावा आणि जनजागृती करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

टोलमाफीचे पास

गणेशोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकणात गावी जात असतात. खासगी वाहनांनी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून टोलमाफी दिली जाते. त्यासाठी वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय, पोलिस ठाणे आदी ठिकाणी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर टोलमाफीचे पास दिले जातात.

किमान आठ दिवस आधी पासवाटप करा

मात्र, पास मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. त्यातच पासवाटपाची माहिती अनेक नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे टोलमाफीचा निर्णय आणि पासवाटप गणेशोत्सवाच्या तोंडावर तीन-चार दिवस आधी सुरू करण्याऐवजी किमान आठ दिवस आधी सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

फास्टॅग कपातीमुळे वाद

टोलमाफीचा पास असतानाही वाहन टोलनाक्यावर गेल्यावर फास्टॅगमधून पैसे आपोआप कपात होतात, अशी तक्रार वाहनचालकांकडून केली जाते. त्यामुळे टोल सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. मागील अनेक वर्षांपासून मुंबई-पुणे महामार्गावर या कारणावरून टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद होत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

प्रवासी संघटनांची मागणी

टोलमाफीचा निर्णय लवकर जाहीर करून पासवाटप किमान आठ दिवस आधी सुरू करावे, तसेच फास्टॅगमधून आपोआप होणाऱ्या कपातीबाबत स्पष्ट उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.

Maharashtra TimesKasara News: कसारा फास्ट लोकल दिवसभरात अवघ्या ११; मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल

पासवाटप आठ दिवस आधी सुरू करा

यंदा मुंबई-गोवा महामार्गावर टोल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पासवाटपाची सुविधा किमान आठ दिवस आधी सुरू करायला हवी. गावाला जाण्याची तयारी सुरू असताना रहिवाशांना पाससाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे एक आठवडा आधीपासून पासवाटप सुरू करणे आवश्यक आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेलचे अध्यक्ष केशव राणे यांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा