मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भाषेवरून वाद निर्माण झाला आहे.महिला जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप करत जरांगेंवर टीका केली जातेय.या वादावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.संयमित आणि योग्य भाषेचा वापर करण्याचे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.शिवछत्रपतींच्या स्मारकासमोर उपोषण सुरू असून जबाबदारीने भाष्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.ते वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांबाबत नव्हतं, गैरसमज करू नका, असे आवाहन पाटील यांनी केले.मराठा समाज कुठल्याही अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही, असे विनोद पाटलांनी स्पष्ट केले.