• Tue. Sep 1st, 2026

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. यासंदर्भात मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात मंत्री आणि आमदारांसह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित आहेत.

वरिष्ठ मंत्री अन् अधिकाऱ्यांची उपस्थिती

उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि आमदार मकरंद पाटील हे या बैठकीला उपस्थित राहिले. प्रशासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जालन्याचे जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा तसेच जालन्याचे पोलीस अधीक्षक या खलबतांमध्ये सहभागी झाले आहेत.

अंतरवाली सराटीकडे शिष्टमंडळ रवाना होण्याची शक्यता

या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठेवलेल्या प्रत्येक मागणीचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेतला जात आहे. कायदेशीर चौकटीत राहून मागण्यांवर कसा मार्ग काढता येईल, यावर भर दिला जात आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रियामिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बैठकीनंतर अधिकाऱ्यांचे एक विशेष शिष्टमंडळ उपोषणस्थळी म्हणजेच अंतरवाली सराटीकडे रवाना होण्याची शक्यता आहे. शासकीय शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सरकारची भूमिका मांडणार आहे.

मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्यास, जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांचे पथक अंतरवाली सराटीत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बैठकीतून काय निर्णय निघतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

“शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. मात्र आंतरवलीला जाणार नाही. अगोदर प्रशासकीय बैठक होईल. त्यानंतर जरांगे पाटील यांना भेटायचे की नाही ते ठरणार. आमची अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल, काय-काय प्रस्ताव आहे, काय विषय आहे ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा आढावा घेऊ”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Maharashtra TimesKolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?“पहिल्यांदा आमचा आढावा होईल. त्यांनी जी माहिती पाठवली आहे त्या संदर्भात चर्चा होईल. अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू त्यानंतर ठरवू. अंतरवलीला जाण्याचे अजून ठरलेले नाही. जाण्याचा अजून विचार केलेला नाही. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, आम्ही त्यांना दिलेले मुद्दे त्या संदर्भात जी माहिती आहे, त्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून जोपर्यंत प्रतिसाद मिळत नाही त्यांची काय भूमिका आहे ते कळत नाही, शेवटी हा विषय चर्चेतून सुटणार आहे”, असं विखे पाटील म्हणाले.

Maharashtra TimesTarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला“आमची अगोदर चर्चा होऊ द्या. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली नाही. मात्र शासन स्तरावर जी कारवाई झाली आहे ती त्यांना पाठवली आहे. त्यांना कुठलाही मसुदा पाठवला नाही. जो निर्णय शासनाने घेतला आहे तो पाठवला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमची प्रशासकीय बैठक आहे. अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक होईल. बैठकीला सर्व अधिकारी बोलावलेले आहेत. बैठक झाल्यानंतर तुम्हाला माहिती देऊ”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.