मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. यासंदर्भात मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात मंत्री आणि आमदारांसह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित आहेत.
वरिष्ठ मंत्री अन् अधिकाऱ्यांची उपस्थिती
उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि आमदार मकरंद पाटील हे या बैठकीला उपस्थित राहिले. प्रशासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जालन्याचे जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा तसेच जालन्याचे पोलीस अधीक्षक या खलबतांमध्ये सहभागी झाले आहेत.
अंतरवाली सराटीकडे शिष्टमंडळ रवाना होण्याची शक्यता
या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठेवलेल्या प्रत्येक मागणीचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेतला जात आहे. कायदेशीर चौकटीत राहून मागण्यांवर कसा मार्ग काढता येईल, यावर भर दिला जात आहे.
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रियामिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बैठकीनंतर अधिकाऱ्यांचे एक विशेष शिष्टमंडळ उपोषणस्थळी म्हणजेच अंतरवाली सराटीकडे रवाना होण्याची शक्यता आहे. शासकीय शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सरकारची भूमिका मांडणार आहे.
मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्यास, जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांचे पथक अंतरवाली सराटीत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बैठकीतून काय निर्णय निघतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
“शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. मात्र आंतरवलीला जाणार नाही. अगोदर प्रशासकीय बैठक होईल. त्यानंतर जरांगे पाटील यांना भेटायचे की नाही ते ठरणार. आमची अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल, काय-काय प्रस्ताव आहे, काय विषय आहे ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा आढावा घेऊ”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?“पहिल्यांदा आमचा आढावा होईल. त्यांनी जी माहिती पाठवली आहे त्या संदर्भात चर्चा होईल. अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू त्यानंतर ठरवू. अंतरवलीला जाण्याचे अजून ठरलेले नाही. जाण्याचा अजून विचार केलेला नाही. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, आम्ही त्यांना दिलेले मुद्दे त्या संदर्भात जी माहिती आहे, त्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून जोपर्यंत प्रतिसाद मिळत नाही त्यांची काय भूमिका आहे ते कळत नाही, शेवटी हा विषय चर्चेतून सुटणार आहे”, असं विखे पाटील म्हणाले.
Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला“आमची अगोदर चर्चा होऊ द्या. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली नाही. मात्र शासन स्तरावर जी कारवाई झाली आहे ती त्यांना पाठवली आहे. त्यांना कुठलाही मसुदा पाठवला नाही. जो निर्णय शासनाने घेतला आहे तो पाठवला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमची प्रशासकीय बैठक आहे. अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक होईल. बैठकीला सर्व अधिकारी बोलावलेले आहेत. बैठक झाल्यानंतर तुम्हाला माहिती देऊ”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा