साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फुलोत्सावाचे लोकार्पण झाले. यंदा पर्यटकांना कास पठारावर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक असणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलोत्सवाला आजपासून (मंगळवारी) प्रारंभ झाला. कास पठारावर विकासकामांची बरसात करण्यात आली असून कास नव्याने उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉप, पर्यटक निवारा शेड तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले कास पठार वेगवेगळ्या प्रजातींच्या फुलांनी बहरून गेले आहे. प्रति दिन केवळ तीन हजार पर्यटकांना तर शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग असलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे.
दिवसाला केवळ 3 हजार प्रवाशांना प्रवेश
कास पठारावर आता चवर, तेरडा, सीतेची आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प आणि कुमुदिनी फुलांना बहर येऊ लागला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना यंदाच्या फुलोत्सवाचे वेध लागले आहेत. पर्यटकांसाठी कास वन समिती सज्ज झाली आहे. पर्यटकांसाठी यंदापासून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, निसर्गसंपदेच्या धोका पोहोचू नये, या दृष्टीकोनातून दिवसाला केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी थेट येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया
कास पठारावर प्रवेशासाठी बुकींग आवश्यक
कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध केली आहे. http://www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून पर्यटकांना बुकिंग करता येईल. १२ वर्षांवरील पर्यटकांना २०० रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. त्यात पार्किंग ते पठारापर्यंत बससेवा समाविष्ट आहे. शालेय सहलीसाठी प्रति विद्यार्थी ४० रुपये शुल्क भरावे लागेल. इलेक्ट्रिक वाहनासाठी १०० रुपये, गाइड शुल्क २०० रुपये प्रति तास (१ व्यक्ती ते १० जणांचा ग्रुप). यंदा पर्यटकांना एकीव व कुमुदिनी टेहळणी मनोऱ्यावरून (वॉच टॉवर) पुष्प पठाराचा नजारा डोळ्यात साठवता येणार आहे.
‘मंडपघळ’ यंदा मुख्य आकर्षण
कास पठारावरील पुष्प हंगामाच्या शुभारंभाला खासदार उदयनराजे भोसले हे वगळता पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दांडी मारली. दरम्यान पर्यटनाचा विस्तार पठारापुरता मर्यादीत न ठेवता परिसरातील नैसर्गिक स्थळांचा देखील विकास करण्यात येत आहे. निसर्गसौंदर्य व जैवविविधतेने नटलेले ‘मंडपघळ’ हे ठिकाण पर्यटकांसाठी यंदा मुख्य आकर्षण ठरणार आहे. पर्यटकांनी फुलांमध्ये पाय देऊ नये, कचरा करू नये, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार संवर्धन समितीने केले आहे.
Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला
उदयनराजे काय म्हणाले?
पुष्प हंगाम शुभारंभदिनी कास पठार वन विभाग कार्यालयाचे देखील उद्घाटन झाले. कास पठारावर यंदा प्रथमच ‘हिरकणी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कास पठाराचे संवर्धन, पर्यटक व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठकयावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ, दिगंबर जाधव, कराडच्या सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, साताऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, संतोष पाटील, पठार वन समितीचे सदस्य उपस्थित होते.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा