Onion Price: वाशीच्या घाऊक बाजारात मंगळवारी कांदा ३८ ते ४४ रुपये प्रतिकिलो होता. किरकोळ बाजारात हा भाव ५० ते ६० रुपये होता
महाराष्ट्रातील नाशिक व लासलगाव परिसरातून विशेष रेल्वे रेकद्वारे (कांदा एक्स्प्रेस) कांदा दिल्ली, चेन्नईसह प्रमुख महानगरांमध्ये पाठवण्यात येणार आहे. सुमारे ८०० टन कांद्याची पहिली कांदा एक्स्प्रेस रेल्वे बुधवारी दिल्लीत पोहोचणार आहे. हा कांदा नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारांमध्ये ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाईल, असे ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले.
Mumbai News: ‘भाषावाद’ न्यायालयात, चार कॅबचालकांची याचिका; मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावाकांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार, नाफेड कडून कांदा पुरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा कांदा बाजारात आला तर किलोमागे सरासरी दोन ते पाच रुपयांचा फरक पडू शकतो, असे कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. मात्र, हा कांदा मुंबई बाजारात कधी पोहोचेल याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे सांगण्यात येते. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर एका महिन्यात २८ टक्क्यांहून अधिक वाढून २५ ऑगस्ट रोजी ४४.७२ रुपये होता .
Mahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?राज्यात साखरेच्या साठ्यावर निर्बंध
राज्यात साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने साखरेच्या साठ्यावर कठोर निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू असणार आहेत. याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसृत केलेल्या आदेशानुसार कोणत्याही साखर विक्रेत्याला साखरेचा साठा प्राप्त झाल्यापासून तो ३० दिवसांपेक्षा जास्त काळ बाळगता येणार नाही. एका वेळी ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, सर्व व्यापाऱ्यांना साठ्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या वेबपोर्टलवर जाहीर करून ती अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
