Mumbai News : ‘भाषावाद’ न्यायालयात, चार कॅबचालकांची याचिका; मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा
रिक्षा, टॅक्सी व कॅबचालकांना व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असताना, ॲप-आधारित कॅब चालवणाऱ्या चार चालकांच्या याचिकेमुळे आता हा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या नियमाने मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून, याविषयी उद्या, गुरुवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.