माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीच मुंबईतील शिवसेना भवनासमोर ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाकरेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टला सकाळी होणाऱ्या पारंपरिक ध्वजारोहणाऐवजी मध्यरात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. असे करण्यामागचे कारणही उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सांगितले.