Marathwada Dam Water Storage: मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, या महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नसल्यास पाणीटंचाईचे आव्हान आहे.
विभागात जुलैच्या मध्यानंतरही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, मराठवाड्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे शेतीसह सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी नदी-नाल्यांना पूरच न आल्यामुळे धरणांत पाणीसाठा झालेला नाही. विभागात आतापर्यंत २४८ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८२ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७३.४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट कायम असल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
Crime News: वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड!
जायकवाडी धरणात ३१.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. निम्न दुधना २३.६६, येलदरी ५१.८९, माजलगाव १६.६७, मांजरा १६.३९, पैनगंगा ४७.११, मानार ४२.१८, निम्न तेरणा २९.३६, विष्णुपुरी ३४.४६ टक्के अशी धरणनिहाय उपलब्ध पाण्याची टक्केवारी आहे. सिना कोळेगाव आणि सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा नाही. विभागातील मोठ्या धरणांत सद्यस्थितीत ३४.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
ऊर्ध्व भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात काही प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी जायकवाडीचा पाणीसाठा २८ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर पोहोचला होता. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा वाढलेला नाही.
Crime News : टेकडीवर वॉकिंगला गेलेल्या उच्चशिक्षित तरुणींची छेडछाड, पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?
गुरुवारनंतर जोर वाढण्याचा अंदाज
गेल्या चोवीस तासांत विभागात सरासरी ७.१ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५.८ मिमी पाऊस झाला आहे. जालना ८, बीड ३.३, लातूर ०.९, धाराशिव ३.२, नांदेड १३.१, परभणी ११.३ आणि हिंगोली १०.७ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. या तुरळक पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसला आहे. एकूण ३५ टक्के क्षेत्रावर अजूनही पेरणी झालेली नाही. पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होणार आहे. २३ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
