मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली. या घटनेवेळी मेट्रो स्थानकात प्रचंड धुराचं साम्राज्य निर्माण झालं. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव मेट्रो स्टेशनच्याखाली बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली ही दुर्घटना घडली. या घटनेत बस जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत सध्या तरी कुणी जखमी झाले आहे का? याची माहिती मिळू शकलेली नाही. पण बसला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट निर्माण झाले होते. मेट्रो स्टेशनखालीच घटना घडल्यामुळे मेट्रो स्टेशनवर सर्वत्र धूर पसरला. हा धूर इतका परसरला की प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. या धुरामुळे सर्व प्रवाशी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आले.
संबंधित घटना ही शुक्रवारी (4 सप्टेंबर) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली. ही बस पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असतानाच या बसला अचानक आग लागल्याची माहिती आहे. बसने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बसमधून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड घाबरले. प्रवासी तातडीने बसमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव बचावल्याची माहिती आहे.
अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल
दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान बसला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट तयार झाले.
मेट्रो स्टेशनवर गोंधळाची स्थिती
अगदी मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली आणि परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. हा धूर वर असलेल्या मेट्रो स्टेशनमध्ये देखील घुसला. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर असलेल्या प्रवाशांमध्ये देखील भीती निर्माण झाली. मेट्रो स्टेशनवर प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर मेट्रो स्टेशनवरील प्रवाशांनी मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Solapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठा गोंधळ उडाला. बसला लागलेली आग भीषण असल्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे महामार्गावर आधीच वाहनांची गर्दी होती. त्यात आगीच्या घटनेमुळे जास्त वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पोलिसांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु
संध्याकाळची वेळ असल्याने ऑफिसची कामे आवरुन घरी जाणाऱ्यांची रस्त्यावर आणि मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी असते. पण आगीच्या घटनेमुळे मेट्रो स्थानकात धूर जमा झाल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दोन मेट्रो स्थानकांवर मेट्रो न थांबवण्याचा निर्णय घेतला. सध्या परिसरात पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. तसेच ही आगीची घटना नेमकी कशामुळे घडली? याचा देखील तपास केला जाणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा