जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं बघायला मिळत आहे. कारण भुसावळ महापालिकेच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : भुसावळ नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गायत्री भंगाळे निवडून आल्यानंतर त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर भाजपच्या शैलजा नारखेडे या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना कुठेच न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून पक्षाच्या तब्बल 12 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृतवातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवारी 2 सप्टेंबर रोजी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर दुसर्याच दिवशी अर्थात गुरुवारी रात्री 10 वाजता भुसावळातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आलेल्या 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. एकाच वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी धक्कातंत्राचा वापर करीत शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशाने भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
माजी नगराध्यक्षांचाही शिवसेनेत प्रवेश
माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले गटनेता सचिन संतोष चौधरींसह 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
Mumbai Bus Fire : मुंबईत गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला भीषण आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
चौधरींच्या नेतृत्वात निवडून आलेले 11 नगरसेवक ‘शिवसेनेत’
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या 12 पैकी 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणार्यांमध्ये गटनेता आणि नगरसेवक सचिन संतोष चौधरी (प्रभाग 19 ब), शेख दिलनबाज इक्बाल (प्रभाग क्र. 12 अ), उल्हास भीमराव पगारे (प्रभाग 2 अ), सुभद्रा गणपत गुंजाळ (प्रभाग 14 ब), अमीन निसार कुरेशी (15 अ), शेख नसीब बी. शेख नदीम (प्रभाग 15 ब), सचिन भास्कर पटेल (16 अ), अकिल नादर पिंजारी (प्रभाग 17 अ), शबाना बी.सिकंदर खान (प्रभाग 17 ब), पुष्पा कैलास चौधरी (प्रभाग 19 अ), सुनीता कृष्णा कर (प्रभाग 13 ब) यांचा समावेश आहे.
Solapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य
नगरसेवक पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे शिवसेनेत?
भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 2025 मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. मात्र गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्याने त्यांचं नगराध्यक्ष पद अपात्र ठरवण्यात आलं होतं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा