अकोला: अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पल्लवी प्रदीप मोरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून या आत्महत्येप्रकरणी अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी कारवाई करत पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचे सासरे दयाराम मोरे यांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील डाबकी रोड परिसरात राहणाऱ्या पल्लवी प्रदीप मोरे या महिलेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच माहेरच्या लोकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार नोंदविली. लग्नानंतर पल्लवीला सातत्याने मानसिक त्रास देत सासरच्या कुटुंबाकडून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप पल्लवीच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे. या छळामुळेच पल्लवीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पल्लवी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती प्रदीप मोरे याच्यासह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत तातडीने कारवाई करत पती प्रदीप मोरे आणि सासरे दयाराम मोरे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसंच इतर आरोपी गीता दयाराम मोरे, संदीप दयाराम मोरे,सपना संदीप मोरे, चैताली संदेश पहुरकर हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पल्लवी मोरे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, त्यांना कोणत्या प्रकारचा छळ सहन करावा लागत होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा