Marathi News Live: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ राज्यातील शेतकऱ्यांना वीजदिलासा मिळाला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या ‘ई-२०’ योजनेबाबत निती आयोगाचा पाच वर्षांपूर्वीचा अहवाल नव्याने चर्चेत आला आहे. ‘ई-२०’मुळे गाड्यांचे मायलेज कमी होईल, असे त्या अहवालात म्हटले होते. ‘ई-२०’च्या अंमलबजावणीची घाई न करता ‘ई-१०’ पेट्रोलचाही पर्याय सुरू ठेवण्याचा सल्ला त्यात देण्यात आला होता.
दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
