Marathi Live News: शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. शहरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. तापमानातही थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल ३०.५ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस शहरात दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, रक्तचोरी प्रकरणातील जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना रद्द केल्यानंतर, ‘एफडीए’ने राज्यातील १९ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केले आहेत. रक्तपेढ्यांना देण्यात आलेल्या निकषांचे काटेकोर पालन न केल्याने आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
